शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: October 18, 2014 02:53 IST

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आता महाराष्ट्रातही लागू करण्यात आली आहे.

नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आता महाराष्ट्रातही लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०१२ पासून इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ही योजना महाराष्ट्रातही लागू करावी, या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावर गांभीर्याने विचार करून ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. वर्षभरापूर्वीच शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. सदर योजना शासकीय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील, योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा २ लक्ष रुपये इतकी असावी, यामध्ये विद्यार्थ्यांच्या किमान गुणाची अट नाही. योजनेसाठी विद्यार्थ्याने अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यमिक पूर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही. योजनेकरिता राज्य स्तरावर सहआयुक्त (शिक्षण), समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांना आणि जिल्हा स्तरावर जिल्हा समाजकल्याण अधिकारी बृहन्मुंबई यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या सर्व मुलींसाठी सध्या सुरू आहे. त्यामध्ये पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा नाही. मात्र केंद्र शासनाच्या इयत्ता ९ वी ते १० वीमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये २ लक्ष रुपये इतके वार्षिक उत्पन्न असणाऱ्या या पालकांच्या इयत्ता ९ वी व १० वी च्या मुलींचा समावेश होणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता आठवीच्या मुली आणि २ लक्ष रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या इयत्ता ९ वी व १० वी च्या मुलींकरिता सध्याची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यापुढेही चालू राहील. (प्रतिनिधी)