शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांनी गाजले वर्ष

By admin | Updated: September 21, 2015 03:06 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबरला २०१४ ला पदभार स्वीकारला होता.

जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे एक वर्ष पूर्ण : विकासाचे व्हिजन हरविले नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबरला २०१४ ला पदभार स्वीकारला होता. आज त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या वर्षभरात एकाही नव्या योजनेची सुरुवात झालेली नाही. परंतु घोटाळ्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले. सत्तापक्षात मतभेद दिसून आले. पदाधिकाऱ्यांत निर्णयक्षमतेचा अभाव असल्याने ते अधिकाऱ्यांवर विसंबून असल्याचे दिसले. सत्तापक्षाबरोबरच विरोधकांनाही आपल्या भूमिकेचा विसर पडल्याचे जाणवले. जि.प.चे अधिकारी व पदाधिकाऱ्यांबरोबरच अभ्यासू सदस्य नसल्याने जिल्ह्याच्या विकासाचे चक्र थांबल्याचे चित्र आहे.निशा सावरकर यांनी संध्या गोतमारे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर शरद डोणेकर हे उपाध्यक्ष झाले. उकेश चव्हाण शिक्षण व वित्त सभापती बनले. आशा गायकवाड कृषी, पुष्पा वाघाडे महिला व बालकल्याण तर दीपक गेडाम समाजकल्याण सभापतिपदी रुजू झाले. पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र या वर्षात कृषी विभागाचा प्लास्टिक क्रेट घोटाळा, ताडपत्री खरेदीची विवादास्पद प्रक्रिया, शिक्षण सभापतींकडून सायकल खरेदीसाठी अन्य सदस्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार तसेच गणवेश खरेदीसाठी मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्याच्या प्रयत्नाची चर्चा चांगलीच गाजली. वर्ष संपले परंतु अद्याप पदाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारातील विभागाचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे ते अधिकाऱ्यांवर विसंबून असल्याचे दिसले. कोणत्याही पदाधिकाऱ्याने वर्षभरात विभागाच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. त्यांना फक्त आपल्या सर्कलचीच चिंता असल्याचे चित्र दिसले. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असतानाही विकासाचे कार्य, योजना, सूचना, नागरिकांच्या हिताची माहिती मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यातही अपयशी ठरले. सत्तेत प्रथमच संधी मिळाल्याने महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी जि.प.मध्ये पतिराज असल्याचे चित्र निर्माण झाले. (प्रतिनिधी)सत्तापक्षातच मतभेदजिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीचे बहुमत असले तरी युतीत मतभेद दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे सदस्य अध्यक्षांच्या विरोधात असल्याचे चित्र बघायला मिळाले. पक्षातील वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे प्रदेश महासचिव श्रीकांत देशपांडे यांना बैठक घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा लागला.