शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजराची हाेते जगात सर्वाधिक तस्करी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

निशांत वानखेडे नागपूर : दुर्मीळ प्रजातीत गणला जाणारा खवले मांजर हा जगात सर्वांत जास्त तस्करी होणारा प्रथम क्रमांकाचा प्राणी ...

निशांत वानखेडे

नागपूर : दुर्मीळ प्रजातीत गणला जाणारा खवले मांजर हा जगात सर्वांत जास्त तस्करी होणारा प्रथम क्रमांकाचा प्राणी आहे. जगात दर पाचव्या मिनिटाला एका खवले मांजराची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती ‘इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) ने त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. म्हणजेच दर पाच मिनिटांनी जंगलातून एक खवले मांजर शिकार किंवा तस्करीसाठी पकडले जाते.

जगात खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळतात. त्यापैकी चार या आफ्रिकेत आणि चार या आशियामध्ये आढळतात. यामध्ये फिलीपिन्स पॅंगोलिन, सुंदा पॅंगोलिन, चाननीज पॅंगोलिन, टेमिन्कची पॅंगोलिन, इंडियन पॅंगोलिन, वाईट बेलिड पॅंगोलिन, जायन्ट गाऊंड पॅंगोलिन, ब्लॅक बेलिड पॅंगोलिन या प्रजातींचा समावेश आहे. भारतात हिमालय आणि ईशान्य भारताच्या भागात चायनीज पॅंगाेलिन आढळून येते, तर इंडियन पॅंगोलिन ही प्रजात सर्वत्र आढळते. भारतात माेठ्या प्रमाणात खवले मांजराची शिकार हाेते, पण या प्राण्याबाबत फार जागृती नसल्याने एखादी कारवाऊ झाल्याशिवाय याबाबत फारशी चर्चा हाेत नाही. विशेष म्हणजे देशात वाघांची संख्या माहिती आहे, त्याप्रमाणे इतर प्राण्यांबाबत गणना हाेतच नाही. काेकणात खवले मांजर संवर्धनासाठी कार्य करणारे भाऊ काटधरे यांच्या मते, भारतात कधीही खवले मांजराचे सर्वेक्षण किंवा गणना झाली नाही. त्यामुळे किती आहेत, किती शिकार हाेते किंवा झाली किंवा किती प्रमाणात तस्करी हाेते, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. अशाप्रकारे डेटा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांतील कारवाईच्या आधारे प्रमाण काढून आययुसीएनने तस्करीचे प्रमाण सादर केले असेल, पण भारतात याबाबत निश्चित आकडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्यानमारमार्गे हाेते तस्करी

जाणकारांच्या मते, भारतात माेठ्या प्रमाणात खवले मांजराची तस्करी हाेते व ते म्यानमारमार्गे चीनला पाेहोचविले जातात. ईशान्य भारतातून चायनीच खवले मांजराची तस्करी उत्तर पूर्व राज्यातून हाेते. याशिवाय नेपाळ मार्गानेही मांजराचे मांस व खवल्यांची तस्करी केली जाते. चीन व आसपासच्या देशात त्याचे मांस आवडीने खाल्ले जाते. शिवाय त्यांच्या खवल्यांद्वारे औषधी, दागिने व महागड्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे त्याला माेठी मागणी आहे.

राज्यात गेल्यावर्षी १५ कारवाया

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराे (डब्ल्यूसीसीबी) चे आदिमलाइ यांनी सांगितले, गेल्यावर्षी महाराष्ट्रात १२ ते १५ ठिकाणी खवले मांजर पकडणाऱ्यांवर कारवाया झाल्या. यामध्ये नागपूरच्या खापा, कळमेश्वर, नांदेड, दापाेली, पुणे आदींचा उल्लेख त्यांनी केला. त्यातून २० ते २५ खवले मांजरांना रेस्क्यू करण्यात आले. मलकापूरमध्ये एका आराेपीकडून १०० खवले मिळविण्यात आले हाेते. २०१५-१६ मध्ये रत्नागिरीकडे एकाच वेळी ६४ किलाे खवले मांजर पकडले हाेते. मात्र, यामध्ये स्थानिक लाेकांचाच सहभाग आढळून आला. आंतरराष्ट्रीय टाेळीचे पुरावे सापडले नाहीत. तस्करी हाेत असेल, पण अलीकडच्या काळात देशात तस्करीचा कुठलाही रिपाेर्ट नसल्याचे आदिमलाइ यांनी स्पष्ट केले.