शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बोलीभाषेचे संवर्धन करा!

By admin | Updated: August 10, 2014 01:29 IST

आदिवासी समाज आज आपल्या अस्मितेसाठी लढा देत आहे. त्यांच्या बोलीभाषा काळानुरूप नष्ट होत आहेत. म्हणून त्यांचे संवर्धन व जतन व्हायला हवे. असे झाले तरच आदिवासी समाज स्पर्धेच्या काळात

जागतिक आदिवासी अस्मिता दिन : मधुकरराव पिचड यांचे प्रतिपादन नागपूर : आदिवासी समाज आज आपल्या अस्मितेसाठी लढा देत आहे. त्यांच्या बोलीभाषा काळानुरूप नष्ट होत आहेत. म्हणून त्यांचे संवर्धन व जतन व्हायला हवे. असे झाले तरच आदिवासी समाज स्पर्धेच्या काळात तग धरू शकेल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग नागपूरच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार आशिष जयस्वाल, विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये, जयप्रकाश गुप्ता, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळीण येथील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पिचड म्हणाले, आदिवासी संस्कृती ही अतिशय समृद्ध असूण सण, प्रथा, परंपरा, नृत्य, भाषा, गीते, नृत्यकला इत्यादी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा वारसा होय. यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी १० वी व १२ वी मध्ये प्राविण्यप्राप्त मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला त्या शाळेतील मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, सांस्कृतिक कला, वसतिगृहातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी भूमिका विशद केली. संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)