शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सावरकरांची बदनामी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध ...

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध करणारे सर्वांत आधी सावरकरांवर टीका करतात. कारण, सावरकर हिंदुत्वाचे मूळ आहेत, असे विचार लेखक विक्रम संपत यांनी व्यक्त केले. ‘सावरकर अ कन्टेस्टेड लेगसी’ या विक्रम संपत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पत्रकार योगेश पवार यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि विक्रम संपत यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान विक्रम संपत म्हणाले, सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायनातून प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणूनच विरोधकांच्या दबावावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओतून बाहेर करण्यात आले होते. आजही सावरकरांच्या बद्दल समाजातील अनेकांकडून द्वेष पसरविला जात आहे. सावरकरांच्या विचारांमधून त्या काळात क्रांतिकारी प्रेरणा घ्यायचे. त्यांना इंग्रजांनी १३ वर्षे कारागृहात ठेवले. अनेकजण सावरकर यांच्यावर ते ब्रिटिशांचा एजंट असल्याचा आणि त्यांची माफी मागितल्याचा आरोप करतात. असे असते तर, ब्रिटिशांनी त्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवले नसते, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे.

पुस्तकाची माहिती देताना ते म्हणाले, सावरकरांचे जीवन यात दोन खंडात वर्णिले आहे. पहिल्या खंडाएवढेच दुसऱ्या खंडालाही वाचकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, आज देशात खऱ्या अर्थाने सावरकरांच्या विचारांची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण सावरकर शिकवायला हवे. त्यांचे देशासाठीचे योगदान विसरणे शक्य नाही.