शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सावरकरांची बदनामी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध ...

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध करणारे सर्वांत आधी सावरकरांवर टीका करतात. कारण, सावरकर हिंदुत्वाचे मूळ आहेत, असे विचार लेखक विक्रम संपत यांनी व्यक्त केले. ‘सावरकर अ कन्टेस्टेड लेगसी’ या विक्रम संपत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पत्रकार योगेश पवार यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि विक्रम संपत यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान विक्रम संपत म्हणाले, सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायनातून प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणूनच विरोधकांच्या दबावावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओतून बाहेर करण्यात आले होते. आजही सावरकरांच्या बद्दल समाजातील अनेकांकडून द्वेष पसरविला जात आहे. सावरकरांच्या विचारांमधून त्या काळात क्रांतिकारी प्रेरणा घ्यायचे. त्यांना इंग्रजांनी १३ वर्षे कारागृहात ठेवले. अनेकजण सावरकर यांच्यावर ते ब्रिटिशांचा एजंट असल्याचा आणि त्यांची माफी मागितल्याचा आरोप करतात. असे असते तर, ब्रिटिशांनी त्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवले नसते, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे.

पुस्तकाची माहिती देताना ते म्हणाले, सावरकरांचे जीवन यात दोन खंडात वर्णिले आहे. पहिल्या खंडाएवढेच दुसऱ्या खंडालाही वाचकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, आज देशात खऱ्या अर्थाने सावरकरांच्या विचारांची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण सावरकर शिकवायला हवे. त्यांचे देशासाठीचे योगदान विसरणे शक्य नाही.