शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांची बदनामी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध ...

नागपूर : सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी काळ्या पाण्याची सजा भोगून आल्यावर पत्रकार आणि कवींनी दिली. आजही देशात हिंदुत्वाचा विरोध करणारे सर्वांत आधी सावरकरांवर टीका करतात. कारण, सावरकर हिंदुत्वाचे मूळ आहेत, असे विचार लेखक विक्रम संपत यांनी व्यक्त केले. ‘सावरकर अ कन्टेस्टेड लेगसी’ या विक्रम संपत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पत्रकार योगेश पवार यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि विक्रम संपत यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान विक्रम संपत म्हणाले, सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायनातून प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणूनच विरोधकांच्या दबावावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओतून बाहेर करण्यात आले होते. आजही सावरकरांच्या बद्दल समाजातील अनेकांकडून द्वेष पसरविला जात आहे. सावरकरांच्या विचारांमधून त्या काळात क्रांतिकारी प्रेरणा घ्यायचे. त्यांना इंग्रजांनी १३ वर्षे कारागृहात ठेवले. अनेकजण सावरकर यांच्यावर ते ब्रिटिशांचा एजंट असल्याचा आणि त्यांची माफी मागितल्याचा आरोप करतात. असे असते तर, ब्रिटिशांनी त्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवले नसते, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे.

पुस्तकाची माहिती देताना ते म्हणाले, सावरकरांचे जीवन यात दोन खंडात वर्णिले आहे. पहिल्या खंडाएवढेच दुसऱ्या खंडालाही वाचकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, आज देशात खऱ्या अर्थाने सावरकरांच्या विचारांची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण सावरकर शिकवायला हवे. त्यांचे देशासाठीचे योगदान विसरणे शक्य नाही.