शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरातील गडकरी स्मृतिस्थळ दुर्लक्षित

By admin | Updated: January 5, 2017 02:08 IST

मराठी साहित्य विश्वात उंची गाठलेल्यांमध्ये राम गणेश गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

विदर्भाचे वैभव : निवासस्थान नाट्यगृहाचीही अवस्था दयनीयच बाबा टेकाडे नागपूर मराठी साहित्य विश्वात उंची गाठलेल्यांमध्ये राम गणेश गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नाट्य, विनोद, कविता क्षेत्रात त्यांनी आपले नाव कोरले. अवघे ३४ वर्षे जगलेले गडकरी हे जीवनाच्या अंतिम टप्प्यात शेवटचे काही दिवस सावनेरात मुक्कामी होते. ते निवासस्थान आजही शाबूत आहे. मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात यासाठी समाधीस्थळ बांधण्यात आले. एवढेच काय तर त्यांच्या नावाने नाट्यगृहही बांधण्यात आले. ही सर्व स्मृतिस्थळे पुणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आली आहे. पण आजही तेवढीच उपेक्षित आहे, जेवढी आधी होती. पुण्यातील घटनेमुळे या स्थळांकडे कुणीतरी धाव घेतील, असे वाटत असताना ती आशाही धूसर झाली. राम गणेश गडकरी यांनी टोपण नावाने साहित्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात लिखाण केले. गोविंदाग्रज या नावाने १५० कविता, बाळकराम या नावाने विनोदी लेख तर राम गणेश गडकरी या नावाने त्यांनी नाटके लिहिली. ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटके खूप गाजली तर यापैकी ‘एकच प्याला’ने नाट्य क्षेत्रातील ‘एव्हरेस्ट’ गाठले. सुप्रसिद्ध नाटककार, कवी, मराठीचे शेक्सपियर, भाषाप्रभू अशी नामाभिधाने राम गणेश गडकरी यांना लाभली. अवघी ३४ वर्षांची आयुर्मर्यादा लाभलेल्या राम गणेश गडकरी हे जीवनातील शेवटचे काही दिवस सावनेरात वास्तव्यास होते. सन १९१८ च्या अखेरच्या महिन्यात प्रकृती खालावल्याने ते सावनेरात वकिलीचा व्यवसाय करणारे थोरले बंधू विनायकराव यांच्याकडे आले. त्यातच २३ जानेवारी १९१९ ला सावनेरमध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत आई सरस्वतीबाई, पत्नी रमाबाई व लेखनिक पांडुरंग बापट हेही सावनेरला होते. सावनेरातील दुमजली घरात त्यांचे बंधू विनायकराव वरच्या माळ्यावर तर रामगणेश गडकरी तळमजल्यावर राहात असत.आजही त्यांची वास्तू जीर्णोद्धाारानंतरही जुनेपण कायम ठेवून आहे. या निवासस्थानी गडकऱ्यांच्या नाट्यातील दृश्यांचे फोटो लावले आहेत. ‘अज्ञाना मरणोत्तर प्रगट ते होईल, तू ते कसे कोठे आणि कधीतरी जगती. मी होऊन गेले असे’ या त्यांच्याच वाक्यपंक्ती एका फलकावर लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे गडकऱ्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या जन्मगावी म्हणजे गुजरातमधील नवसारीची माती चिंतामण कोल्हटकरांनी कर्मभूमीत सावनेरला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणून टाकली. त्यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीची भेट करून दिली.आज सावनेरला राम गणेश गडकरींचा अर्धाकृती पुतळा, कोलार नदीच्या काठावर समाधी, निवासस्थान, नाट्य सभागृह, खुला रंगमंच आदी आहेत. मात्र नाट्य प्रशिक्षण केंद्र आणि गडकरी साहित्य केंद्राची नितांत गरज आहे. गडकऱ्यांच्या या भूमीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, याकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. पुढील पिढीला राम गणेश गडकऱ्यांच्या साहित्यांचा अभ्यास करता यावा म्हणून हे अनमोल साहित्य जपणे अत्यावश्यक आहे. हे साहित्य कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. मराठी रंगभूमीतील नाटक एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन आदींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले, हेही तितकेच खरे. (प्रतिनिधी)