शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सतरंजीपुरावासी क्वारंटाईन वादावर निर्णय राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:56 IST

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील १४०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्याच्या कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाºया याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.

ठळक मुद्देहायकोर्ट : मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील १४०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्याच्या कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाºया याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी पूर्ण झाली.छावणी येथील मो. निशत मो. सलीम यांनी ही याचिका दाखल केली. नियमानुसार कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनाच १४ दिवस क्वारंटाईन करता येते. परंतु, प्रशासनाने सतरंजीपुरामध्ये या नियमाची पायमल्ली करून सरसकट १४०८ नागरिकांना क्वारंटाईन केले. ही कारवाई करण्यापूर्वी नागरिकांची रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असे याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी शहरातील क्वारंटाईन सेंटरवरही आक्षेप घेतले. हे सेंटर शहराच्या बाहेर असायला पाहिजे. परंतु, नागपुरात आमदार निवास, वनामती, रविभवन व व्हीएनआयटी होस्टेल येथे क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले. हे सर्व सेंटर घनदाट वस्तीत आहेत. त्यामुळे या परिसरात कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.मध्यस्थी अर्जदारांचे वकील अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. शंतनू घाटे यांनीही महापालिकेच्या विविध अवैध कारवाया व निर्णयांवर आक्षेप घेऊन न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. महानगरपालिकेचे वकील अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी सर्व कारवायांचे जोरदार समर्थन केले. मनपाने कायदे व नियमांच्या अधीन राहून आवश्यक ती पावले उचलली आहेत असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले तर, अ‍ॅड. मंडलेकर यांना अ‍ॅड. रोहन मालविया यांनी सहकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय