शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची रिफायनिंग क्षमता पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पाच ...

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची रिफायनिंग क्षमता पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठायचा असेल तर देशाच्या सर्वच भागासह विदर्भाचादेखील सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी उद्योगक्षेत्राप्रमाणेच राजकीय नेत्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. विकास महात्मे, लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार आशिष देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वेद (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) या संस्थेतर्फे विदर्भात पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वेदच्या या प्रयत्नांना नेत्यांनीदेखील पाठबळ दिले आहे. धर्मेंद्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रांमध्ये नेत्यांनी विदर्भावर आतापर्यंत झालेला अन्याय, विदर्भातील क्षमता, प्रकल्प स्थापन झाल्यावर होणारे फायदे, इत्यादी मुद्दे सविस्तरपणे मांडले आहेत. वेदने पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी सर्वांनी मागणी केली आहे.

वाहतूक खर्चात बचत

मध्य भारतात वर्षभरात १५ दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांची आवश्यकता असून, हा पुरवठा पश्चिम किनारपट्टीहून होतो. प्रकल्प नागपुरात आला तर वाहतुकीचा १० हजार कोटींचा अवाढव्य खर्चदेखील वाचेल.

- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री

उद्योग स्थापनेला पाठबळ मिळेल

नागपुरात प्रकल्प स्थापन झाला तर विदर्भात उद्योग स्थापनेला पाठबळ मिळेल. शिवाय नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने येथून देशाच्या कुठल्याही भागात सहजतेने पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करता येईल.

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मध्य भारतातील उद्योगक्षेत्राचा विकास

मध्य भारतात सुमारे १५ सिमेंट कंपन्या आहेत व नागपूर-रायपूर येथे दोन मोठे विमानतळ आहेत. नागपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन झाली तर या सिमेंट कंपन्यांसोबतच मध्य भारतातील विविध उद्योगांना कच्चा माल पुरवता येऊ शकेल.

-विजय दर्डा, माजी खासदार व चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड

एमएसएमईला चालना मिळेल

पेट्रोलियम रिफायनरीमुळे जोड उद्योगांची आवश्यकता भासेल व एमएसएमईमधील नवीन उद्योगांनादेखील चालना मिळेल.

-डॉ. विकास महात्मे, खासदार

उद्योगक्षेत्राला बूस्टर डोस मिळेल

नागपूरजवळ पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्प स्थापन झाला तर येथील उद्योगक्षेत्रांना कमी दरात पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होतील व उद्योगक्षेत्राला बूस्टर डोस मिळेल.

-अजय संचेती, माजी खासदार

लाखो रोजगार निर्माण होतील

हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल, तसेच तीन लाख कोटींच्या या प्रकल्पातून लाखो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

-आशिष देशमुख, माजी आमदार

रिफायनरीमुळे विदर्भाचा फायदा

- मध्य भारतातील उद्योगक्षेत्रांना कमी दरात पेट्रोलियम पदार्थ मिळतील.

- या प्रकल्पामुळे हिंगणा, बुटीबोरी व मिहान या औद्योगिक भागासह मध्य भारतातील उद्योगक्षेत्राचा विकास होईल.

- विदर्भात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाच लाख रोजगारांची निर्मिती होईल.

- नागपुरातील प्रकल्पातून विदर्भाचे औद्योगिक मागासलेपण निश्चितपणे दूर होईल.

- विदर्भातून देशाच्या सर्व भागातील निर्यात वाढेल.