शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विद्यापीठात बहरणार सप्तपर्णी

By admin | Updated: July 5, 2017 02:13 IST

राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती मार्गावरील विद्यापीठाचे परीक्षा भवन, ‘एलआयटी’ परिसर, उद्यान येथे सुमारे १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने मेलींगटोनिया, सप्तपर्णी, सीलव्हर ओक आदी झाडांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, वन विभागाचे वनसंरक्षक गिरीपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, एनएसएस समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान विभागाचे अधीक्षक प्रवीण गोतमारे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.शाळांमध्ये लावले ‘कथेचे झाड’ग्रंथसहवासचे समन्वयक दिलीप म्हैसाळकर यांच्या संकल्पनेतून शहरातील शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘लावू झाड ...कथेचे’ असे या उपक्रमाचे नाव असून विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचनाची आवड गोष्ट सांगून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात हडस व सोमलवार शाळेपासून करण्यात आली. हडस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ए. पी. जोशी, पर्यवेक्षक दीप फडके, एनसीसी प्रमुख सुशील वंजारी तसेच, विदर्भ साहित्य संघाकडून ग्रंथसहवासचे दिलीप म्हैसाळकर, हडस शाळेच्या माजी विद्यार्थिनी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, अभिषेक वाघमारे व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी दिलीप म्हैसाळकर व डॉ. अंजली भांडारकर यांच्या हस्ते शाळेला ग्रंथभेट देण्यात आली. अभिषेक वंजारी यांनी आद्यकथाकार गुणाढ्य यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला तर मंजुषा जोशी यांनी गुणाढ्याची एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेची यंदाची दहावीची गुणवंत विद्यार्थिनी रश्मी जांभूळकर व एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सोमलवार रामदासपेठ शाळेत मुख्याध्यापिका वैशाली डाखोळे, ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ.अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अजय वैद्य आणि रेवती जोशी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे अव्वल तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कथाकथनासोबतच, शहरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार असून शाळेला ग्रंथभेटही दिली जाणार आहे.