शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

विद्यापीठात बहरणार सप्तपर्णी

By admin | Updated: July 5, 2017 02:13 IST

राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती मार्गावरील विद्यापीठाचे परीक्षा भवन, ‘एलआयटी’ परिसर, उद्यान येथे सुमारे १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने मेलींगटोनिया, सप्तपर्णी, सीलव्हर ओक आदी झाडांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, वन विभागाचे वनसंरक्षक गिरीपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, एनएसएस समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान विभागाचे अधीक्षक प्रवीण गोतमारे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.शाळांमध्ये लावले ‘कथेचे झाड’ग्रंथसहवासचे समन्वयक दिलीप म्हैसाळकर यांच्या संकल्पनेतून शहरातील शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘लावू झाड ...कथेचे’ असे या उपक्रमाचे नाव असून विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचनाची आवड गोष्ट सांगून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात हडस व सोमलवार शाळेपासून करण्यात आली. हडस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ए. पी. जोशी, पर्यवेक्षक दीप फडके, एनसीसी प्रमुख सुशील वंजारी तसेच, विदर्भ साहित्य संघाकडून ग्रंथसहवासचे दिलीप म्हैसाळकर, हडस शाळेच्या माजी विद्यार्थिनी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, अभिषेक वाघमारे व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी दिलीप म्हैसाळकर व डॉ. अंजली भांडारकर यांच्या हस्ते शाळेला ग्रंथभेट देण्यात आली. अभिषेक वंजारी यांनी आद्यकथाकार गुणाढ्य यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला तर मंजुषा जोशी यांनी गुणाढ्याची एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेची यंदाची दहावीची गुणवंत विद्यार्थिनी रश्मी जांभूळकर व एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सोमलवार रामदासपेठ शाळेत मुख्याध्यापिका वैशाली डाखोळे, ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ.अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अजय वैद्य आणि रेवती जोशी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे अव्वल तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कथाकथनासोबतच, शहरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार असून शाळेला ग्रंथभेटही दिली जाणार आहे.