शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात बहरणार सप्तपर्णी

By admin | Updated: July 5, 2017 02:13 IST

राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती मार्गावरील विद्यापीठाचे परीक्षा भवन, ‘एलआयटी’ परिसर, उद्यान येथे सुमारे १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने मेलींगटोनिया, सप्तपर्णी, सीलव्हर ओक आदी झाडांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, वन विभागाचे वनसंरक्षक गिरीपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, एनएसएस समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान विभागाचे अधीक्षक प्रवीण गोतमारे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.शाळांमध्ये लावले ‘कथेचे झाड’ग्रंथसहवासचे समन्वयक दिलीप म्हैसाळकर यांच्या संकल्पनेतून शहरातील शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘लावू झाड ...कथेचे’ असे या उपक्रमाचे नाव असून विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचनाची आवड गोष्ट सांगून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात हडस व सोमलवार शाळेपासून करण्यात आली. हडस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ए. पी. जोशी, पर्यवेक्षक दीप फडके, एनसीसी प्रमुख सुशील वंजारी तसेच, विदर्भ साहित्य संघाकडून ग्रंथसहवासचे दिलीप म्हैसाळकर, हडस शाळेच्या माजी विद्यार्थिनी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, अभिषेक वाघमारे व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी दिलीप म्हैसाळकर व डॉ. अंजली भांडारकर यांच्या हस्ते शाळेला ग्रंथभेट देण्यात आली. अभिषेक वंजारी यांनी आद्यकथाकार गुणाढ्य यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला तर मंजुषा जोशी यांनी गुणाढ्याची एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेची यंदाची दहावीची गुणवंत विद्यार्थिनी रश्मी जांभूळकर व एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सोमलवार रामदासपेठ शाळेत मुख्याध्यापिका वैशाली डाखोळे, ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ.अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अजय वैद्य आणि रेवती जोशी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे अव्वल तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कथाकथनासोबतच, शहरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार असून शाळेला ग्रंथभेटही दिली जाणार आहे.