शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात बहरणार सप्तपर्णी

By admin | Updated: July 5, 2017 02:13 IST

राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात किमान चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अमरावती मार्गावरील विद्यापीठाचे परीक्षा भवन, ‘एलआयटी’ परिसर, उद्यान येथे सुमारे १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने मेलींगटोनिया, सप्तपर्णी, सीलव्हर ओक आदी झाडांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, वन विभागाचे वनसंरक्षक गिरीपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे, एनएसएस समन्वयक डॉ. केशव वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यान विभागाचे अधीक्षक प्रवीण गोतमारे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.शाळांमध्ये लावले ‘कथेचे झाड’ग्रंथसहवासचे समन्वयक दिलीप म्हैसाळकर यांच्या संकल्पनेतून शहरातील शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘लावू झाड ...कथेचे’ असे या उपक्रमाचे नाव असून विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचनाची आवड गोष्ट सांगून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमांची सुरुवात हडस व सोमलवार शाळेपासून करण्यात आली. हडस हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. ए. पी. जोशी, पर्यवेक्षक दीप फडके, एनसीसी प्रमुख सुशील वंजारी तसेच, विदर्भ साहित्य संघाकडून ग्रंथसहवासचे दिलीप म्हैसाळकर, हडस शाळेच्या माजी विद्यार्थिनी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भांडारकर, अभिषेक वाघमारे व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी दिलीप म्हैसाळकर व डॉ. अंजली भांडारकर यांच्या हस्ते शाळेला ग्रंथभेट देण्यात आली. अभिषेक वंजारी यांनी आद्यकथाकार गुणाढ्य यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला तर मंजुषा जोशी यांनी गुणाढ्याची एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेची यंदाची दहावीची गुणवंत विद्यार्थिनी रश्मी जांभूळकर व एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सोमलवार रामदासपेठ शाळेत मुख्याध्यापिका वैशाली डाखोळे, ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ.अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अजय वैद्य आणि रेवती जोशी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे अव्वल तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कथाकथनासोबतच, शहरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार असून शाळेला ग्रंथभेटही दिली जाणार आहे.