शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणी, गटारलाईनमुळे संजयनगरवासी त्रस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून होत आहे. नागपूरकरांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील संजयनगरातील ...

नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून होत आहे. नागपूरकरांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील संजयनगरातील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या भागात नागरिकांना रस्ते, पाणी, उद्यान आदी समस्यांसाठी लढा द्यावा लागत आहे. महापालिकेने आपल्या समस्या सोडविण्याची मागणी ते करीत आहेत.

गटारलाईनमुळे नागरिक त्रस्त

संजयनगरात नागरिक गटारलाईनच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार गटारलाईन चोक होत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. गटारलाईन चोक झाल्यामुळे नागरिकांच्या घरात घाण पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील गटारलाईनची सफाई करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

नळाला अपुरे पाणी मिळत असल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे महापालिकेने या भागात उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद असलेल्या कूपनलिका सुरू केल्यास नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबू शकते.

खराब रस्त्यामुळे वाढले अपघात

संजयनगर भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडलेली असल्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे खड्डा दिसत नसून वाहनचालक खाली पडतात. त्यामुळे या भागातील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय या भागात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून पायदळ चालावे लागते. महापालिकेने या भागात फूटपाथ तयार करण्याची गरज आहे.

स्वच्छतेचा अभाव

परिसरात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे सर्वत्र कचरा साचलेला दिसतो. काही नागरिक आपल्या घराजवळील कचरा झाडतात. परंतु या भागात अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची मागणी होत आहे. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात गार्डनची सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.

गटारलाईनची देखभाल व्हावी

‘गटारलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने या भागात गटारलाईनची नियमित देखभाल करण्याची मागणी आहे.’

- देवीदास रिनके, नागरिक

दररोज सफाई व्हावी

‘सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे या भागात सर्वत्र कचरा साचलेला असतो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी नियमित येण्याची गरज आहे.’

- बंडू प्रधान, नागरिक

कूपनलिका दुरुस्त कराव्यात

‘या भागातील बहुतांश कूपनलिका बंद आहेत. नळालाही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील कूपनलिका दुरुस्त केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.’

- साबरा बानो, महिला

रस्त्याची डागडुजी महत्त्वाची

‘परिसरात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी आहे.’

- गोविंद पवार, नागरिक

उद्यानाची व्यवस्था हवी

‘लहान मुलांना उद्यान नसल्यामुळे ते रस्त्यावर खेळतात. त्यामुळे महापालिकेने या भागात लहान मुलांसाठी उद्यानाची सुविधा उपलब्ध करून लहान मुलांची होत असलेली गैरसोय दूर करावी.’

- शे. एजाज, नागरिक

फूटपाथ नसल्यामुळे गैरसोय

‘संजय गांधीनगरात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पायदळ चालणारे नागरिक फूटपाथ नसल्यामुळे रस्त्यावरून चालत असल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे या भागात फूटपाथची व्यवस्था करण्याची गरज आहे.’

- शांताबाई चिंचुरकर, महिला

.............