शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

संघाने दिला संपूर्ण काश्मीरचा नारा

By admin | Updated: October 13, 2016 03:43 IST

भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावरून काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे.

सरसंघचालकांचा पाकिस्तानवर प्रहार : ‘सर्जिकल स्ट्राइक’बाबत केंद्राला शाबासकी नागपूर : भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावरून काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे. संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टिस्तान या पाकव्याप्त काश्मीरमधील भागांसह संपूर्ण काश्मीरवर भारताचाच अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. मोदी सरकार व सैन्याला शाबासकी देत संपूर्ण काश्मीरबाबत केंद्र सरकारने आक्रमक भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनदेखील त्यांनी यावेळी केले. संघाच्या नव्या गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता हे विशेष.मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून १९७६ च्या भारतीय आर्थिक सेवेचे अधिकारी सत्यप्रकाश राय हे उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्कराने जे काम करून दाखवले ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय. भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनीतीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करीत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. सीमेपलीकडून काश्मिरातील जनतेला फूस लावण्याचे काम केले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. असे होऊ नये यासाठी तेथे विजयाबरोबरच विश्वासाचेही वातावरण निर्माण करावे लागेल, असे ते म्हणाले.आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार काम करणारे आहे, उदासीन नाही.