शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

संघ स्वयंसेवक ‘नापास’

By admin | Updated: February 8, 2017 02:56 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले

समाजकारणातून राजकारणाची ओढ कशी ? : संघ वर्तुळात अस्वस्थता नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले. साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून दोन हात लांबच असतो, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र अचानक राजकारणाच्या सारीपाटात उडी घेण्याची ओढ स्वयंसेवकांना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय लढाईत काय होईल, ते येणारा काळच सांगेल. मात्र संघ संस्कारांच्या व्याख्येनुसार नाराजीमुळे राजकारणाला जवळ करणारे स्वयंसेवक नापासच झाल्याची चर्चा आहे. गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यानंतर हे लोण संघ मुख्यालयाच्या भूमीत येऊन पोहोचले आहे. परंपरेला छेद जात असल्यामुळे संघ वर्तुळात निश्चितच अस्वस्थतेचे वातावरण आहे. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर नाराज कार्यकर्ते भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले. अखेरच्या दिवशी बहुतांश नाराजांनी आपले अर्ज मागे घेतले व आपण संघशिस्तीत असल्याचा दावा केला. मात्र धनुष्यातून बाण अगोदरच सुटून गेला होता. एरवी मनाविरोधात एखादी गोष्ट झाली तरी संघटनहिताला सर्वोच्च प्राधान्य मानून कार्य करण्याचे संघात संस्कार देण्यात येतात. मात्र या उमेदवारांनी अगोदरच बंडखोरी करून समाजकारणातून सत्ताकारणाकडे वळण्याचे पाऊल उचलले. याबाबत संघाकडून गंभीरपणे मंथन होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी) राजकारणाची लागण कशी झाली? केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे भाजपाला ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात चांगलेच यश आले. मात्र नाराजीतून झालेल्या बंडामुळे स्वयंसेवकांची पावले सत्तेकडे वळत असल्याचे दिसून आले. भाजपावर आपले थेट नियंत्रण नाही, असे संघाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संघ कधीही खुल्यापणाने कुठल्याही पक्षाचा प्रचार करीत नाही. समाजकारणाचा वसा हाती घेतला असताना स्वयंसेवकांना राजकारणाची लागण झाली तरी कशी? की सत्तेच्या मोहामुळे तत्त्व गुंडाळून ठेवायला ते तयार झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.