शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

संघ स्वयंसेवक ‘नापास’

By admin | Updated: February 8, 2017 02:56 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले

समाजकारणातून राजकारणाची ओढ कशी ? : संघ वर्तुळात अस्वस्थता नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले. साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून दोन हात लांबच असतो, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र अचानक राजकारणाच्या सारीपाटात उडी घेण्याची ओढ स्वयंसेवकांना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय लढाईत काय होईल, ते येणारा काळच सांगेल. मात्र संघ संस्कारांच्या व्याख्येनुसार नाराजीमुळे राजकारणाला जवळ करणारे स्वयंसेवक नापासच झाल्याची चर्चा आहे. गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यानंतर हे लोण संघ मुख्यालयाच्या भूमीत येऊन पोहोचले आहे. परंपरेला छेद जात असल्यामुळे संघ वर्तुळात निश्चितच अस्वस्थतेचे वातावरण आहे. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर नाराज कार्यकर्ते भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले. अखेरच्या दिवशी बहुतांश नाराजांनी आपले अर्ज मागे घेतले व आपण संघशिस्तीत असल्याचा दावा केला. मात्र धनुष्यातून बाण अगोदरच सुटून गेला होता. एरवी मनाविरोधात एखादी गोष्ट झाली तरी संघटनहिताला सर्वोच्च प्राधान्य मानून कार्य करण्याचे संघात संस्कार देण्यात येतात. मात्र या उमेदवारांनी अगोदरच बंडखोरी करून समाजकारणातून सत्ताकारणाकडे वळण्याचे पाऊल उचलले. याबाबत संघाकडून गंभीरपणे मंथन होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी) राजकारणाची लागण कशी झाली? केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे भाजपाला ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात चांगलेच यश आले. मात्र नाराजीतून झालेल्या बंडामुळे स्वयंसेवकांची पावले सत्तेकडे वळत असल्याचे दिसून आले. भाजपावर आपले थेट नियंत्रण नाही, असे संघाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संघ कधीही खुल्यापणाने कुठल्याही पक्षाचा प्रचार करीत नाही. समाजकारणाचा वसा हाती घेतला असताना स्वयंसेवकांना राजकारणाची लागण झाली तरी कशी? की सत्तेच्या मोहामुळे तत्त्व गुंडाळून ठेवायला ते तयार झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.