शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संघ स्वयंसेवक ‘नापास’

By admin | Updated: February 8, 2017 02:56 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले

समाजकारणातून राजकारणाची ओढ कशी ? : संघ वर्तुळात अस्वस्थता नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले. साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून दोन हात लांबच असतो, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र अचानक राजकारणाच्या सारीपाटात उडी घेण्याची ओढ स्वयंसेवकांना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय लढाईत काय होईल, ते येणारा काळच सांगेल. मात्र संघ संस्कारांच्या व्याख्येनुसार नाराजीमुळे राजकारणाला जवळ करणारे स्वयंसेवक नापासच झाल्याची चर्चा आहे. गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यानंतर हे लोण संघ मुख्यालयाच्या भूमीत येऊन पोहोचले आहे. परंपरेला छेद जात असल्यामुळे संघ वर्तुळात निश्चितच अस्वस्थतेचे वातावरण आहे. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर नाराज कार्यकर्ते भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले. अखेरच्या दिवशी बहुतांश नाराजांनी आपले अर्ज मागे घेतले व आपण संघशिस्तीत असल्याचा दावा केला. मात्र धनुष्यातून बाण अगोदरच सुटून गेला होता. एरवी मनाविरोधात एखादी गोष्ट झाली तरी संघटनहिताला सर्वोच्च प्राधान्य मानून कार्य करण्याचे संघात संस्कार देण्यात येतात. मात्र या उमेदवारांनी अगोदरच बंडखोरी करून समाजकारणातून सत्ताकारणाकडे वळण्याचे पाऊल उचलले. याबाबत संघाकडून गंभीरपणे मंथन होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी) राजकारणाची लागण कशी झाली? केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे भाजपाला ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात चांगलेच यश आले. मात्र नाराजीतून झालेल्या बंडामुळे स्वयंसेवकांची पावले सत्तेकडे वळत असल्याचे दिसून आले. भाजपावर आपले थेट नियंत्रण नाही, असे संघाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संघ कधीही खुल्यापणाने कुठल्याही पक्षाचा प्रचार करीत नाही. समाजकारणाचा वसा हाती घेतला असताना स्वयंसेवकांना राजकारणाची लागण झाली तरी कशी? की सत्तेच्या मोहामुळे तत्त्व गुंडाळून ठेवायला ते तयार झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.