शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संघात इन्सेंटिव्ह मिळत नाहीत : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:10 IST

साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्तम बनण्याचा प्रयत्न करते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पसर््िास्टंट सिस्टीम्स लि. च्या सौजन्याने श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन नागपूर निर्मित ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी कवि कुलगुरू कालिदास सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्यासह पर्सिस्टंटचे एचआर हेड समीर बेंद्रे, महानगर संघ चालक राजेश लोया, नाटकाचे लेखक अविनाश घांगरेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, आम्ही संघाचे अभिन्न अंग आहोत. राष्ट्र आराधना हा शब्द बुद्धीतून नाही तर हृदयातून आलेला आहे. मी क्रांतीतून असे म्हणणार नाही. कारण क्रांती ही काही प्रमाणात थोपवली जाते. संघ कोणतीच गोष्ट थोपवू इच्छित नाही. खूप विचारविमर्श करून संघ स्थापनेची घोषणा झाली. आपला देश विश्वगुरू बनण्यासाठी समाजाला योग्य विचाराने रस्ता दाखविण्याचे काम संघ करीत आहे. या नाटकाच्या माध्यमातून समाजाला संघाचा परिचय होईल. स्वयंसेवकांनाही चिंतनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित राहून संपूर्ण नाटक पाहिले. ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकात संघाची स्थापना कोणत्या परिस्थितीत व कशासाठी करण्यात आली इथपासून ते संघाची ध्येय धोरणे, शाखांचा विस्तार स्वातंत्र्य संग्रामात संघाचे स्थान आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी संघ स्थापनेसाठी केलेले परिश्रम व संघाच्या विस्तारासाठी उपसलेले कष्ट यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाची धुरा कशी यशस्वीरीत्या सांभाळली यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघाला दिलेल्या भेटीचे प्रसंगही यात अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर आलेले निर्बंध, १९४८ मध्ये पाकशी झालेल्या युद्धात स्वयंसेवकांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार व काश्मीरच्या विलिनीकरणात संघाने दिलेले योगदान या सर्वबाबींवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत