शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
4
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
5
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
6
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
7
डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
8
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
9
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
10
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
11
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
12
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
13
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
14
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
15
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
16
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
17
12 Grape Theory: घड्याळाचे १२ ठोके अन् १२ द्राक्ष; नवं वर्षात चमकेल नशीब; काय आहे 'ग्रेप थ्योरी', तरुणाईला लावलं वेड
18
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
19
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
20
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संघात इन्सेंटिव्ह मिळत नाहीत : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:10 IST

साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्तम बनण्याचा प्रयत्न करते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पसर््िास्टंट सिस्टीम्स लि. च्या सौजन्याने श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन नागपूर निर्मित ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी कवि कुलगुरू कालिदास सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्यासह पर्सिस्टंटचे एचआर हेड समीर बेंद्रे, महानगर संघ चालक राजेश लोया, नाटकाचे लेखक अविनाश घांगरेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, आम्ही संघाचे अभिन्न अंग आहोत. राष्ट्र आराधना हा शब्द बुद्धीतून नाही तर हृदयातून आलेला आहे. मी क्रांतीतून असे म्हणणार नाही. कारण क्रांती ही काही प्रमाणात थोपवली जाते. संघ कोणतीच गोष्ट थोपवू इच्छित नाही. खूप विचारविमर्श करून संघ स्थापनेची घोषणा झाली. आपला देश विश्वगुरू बनण्यासाठी समाजाला योग्य विचाराने रस्ता दाखविण्याचे काम संघ करीत आहे. या नाटकाच्या माध्यमातून समाजाला संघाचा परिचय होईल. स्वयंसेवकांनाही चिंतनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित राहून संपूर्ण नाटक पाहिले. ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकात संघाची स्थापना कोणत्या परिस्थितीत व कशासाठी करण्यात आली इथपासून ते संघाची ध्येय धोरणे, शाखांचा विस्तार स्वातंत्र्य संग्रामात संघाचे स्थान आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी संघ स्थापनेसाठी केलेले परिश्रम व संघाच्या विस्तारासाठी उपसलेले कष्ट यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाची धुरा कशी यशस्वीरीत्या सांभाळली यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघाला दिलेल्या भेटीचे प्रसंगही यात अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर आलेले निर्बंध, १९४८ मध्ये पाकशी झालेल्या युद्धात स्वयंसेवकांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार व काश्मीरच्या विलिनीकरणात संघाने दिलेले योगदान या सर्वबाबींवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत