शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

उपराजधानीत संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 02:59 IST

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जनजीवन विस्कळीत : नागपुरात २१.६ मिमी. पाऊस नागपूर : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांपासून शहरात अखंड रिपरिप सुरू असून शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापर्यंत २१.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी त्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र प्रचंड फायदा झाला आहे. कृषी विभागाच्या कागदावर आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.२१ टक्केच पेरण्या आटोपल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७५ मिमी. पाऊस पडला आहे. शिवाय ८ जुलै रोजी एका दिवसांत जिल्ह्यात २४.२५ मिमी. पाऊस झाला आहे. सरासरी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६२.८७ मिमी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा २७५.०९ मिमी. पाऊस झाला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यातील पावसाची सरासरी पाहता जूनमध्ये १७३.४४ मिमी, जुलैमध्ये ३४६.५४, आॅगस्ट २७४.४४, सप्टेंबरमध्ये १९४.१८ व आॅक्टोबरमध्ये ४८.८६ मिमी. पाऊस पडतो. तसेच १ जून ते ३१ मे या काळात जिल्ह्यात सरासरी ११३८.८६ मिमी. पाऊस पडत असून १ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान १०३७.४५ मिमी. पावसाची सरासरी असते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिना सुरू होताच दमदार पावसाची एन्ट्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर जून महिन्यातील अनुशेषसुद्धा भरून निघालेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)नागपूर : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांपासून शहरात अखंड रिपरिप सुरू असून शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापर्यंत २१.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी त्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र प्रचंड फायदा झाला आहे. कृषी विभागाच्या कागदावर आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.२१ टक्केच पेरण्या आटोपल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७५ मिमी. पाऊस पडला आहे. शिवाय ८ जुलै रोजी एका दिवसांत जिल्ह्यात २४.२५ मिमी. पाऊस झाला आहे. सरासरी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६२.८७ मिमी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा २७५.०९ मिमी. पाऊस झाला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यातील पावसाची सरासरी पाहता जूनमध्ये १७३.४४ मिमी, जुलैमध्ये ३४६.५४, आॅगस्ट २७४.४४, सप्टेंबरमध्ये १९४.१८ व आॅक्टोबरमध्ये ४८.८६ मिमी. पाऊस पडतो. तसेच १ जून ते ३१ मे या काळात जिल्ह्यात सरासरी ११३८.८६ मिमी. पाऊस पडत असून १ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान १०३७.४५ मिमी. पावसाची सरासरी असते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिना सुरू होताच दमदार पावसाची एन्ट्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर जून महिन्यातील अनुशेषसुद्धा भरून निघालेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)