शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

जिल्ह्यातील ८१ गावांचे नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या जिल्ह्यातील १०६६ गावांतील पाण्याच्या नमुन्यांपैकी ८१ नमुने प्रदूषित आढळून ...

नागपूर : नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या जिल्ह्यातील १०६६ गावांतील पाण्याच्या नमुन्यांपैकी ८१ नमुने प्रदूषित आढळून आले आहेत. मागील तपासणीच्या तुलनेत यंदा प्रदूषित प्रमाण वाढले आहे. रामटेक, भिवापूर परिसरातील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचेही समोर आले आहे.

पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ग्रामीण भागात अजूनही प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येते. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून येणाऱ्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. दर महिन्याला होणाऱ्या या तपासणीच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेचा अंदाज घेतला जातो. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुलै महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १०६६ जलनमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यापैकी ८१ नमुने दूषित आढळून आले. रामटेक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतल्या गेलेल्या ७४ नमुन्यांपैकी १२ अर्थात १६ टक्के, तसेच भिवापुरातील १२९ नमुन्यांपैकी २० अर्थात १६ टक्के नमुने दूषित आढळून आलेत. त्याखालोखाल देवलापार येथील १३, तर कळमेश्वमधील ११ टक्के नमुने दूषित आढळून आले.

- कुहीतील एकही पाणी नमुना दूषित नाही

कुही भागातील पाणी पिण्यायोग्य असून, तेथील एकही नमुना दूषित नव्हता. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी प्रदूषित पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.