शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रेल्वेत समोसा, सँडविच महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 09:00 IST

Nagpur News रेल्वेतील जेवणच नव्हे तर समोसा, सँडविचही चांगलेच भाव खात असल्याने हे खरेदी करून खाणे या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

नागपूर : भारतीय नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला मान दिला जातो. परवडणाऱ्या दराचे तिकीट घेऊन या गावावरून त्या गावी ती घेऊन जात असल्याने सर्वाधिक गोरगरीब रेल्वेत प्रवास करतात. ही मंडळी कष्टकरी असते. एका राज्यातून कामाच्या शोधात ती दुसऱ्या राज्यात जाते. त्यांच्याकडे खाण्यापिण्याचेही काही साधन नसते. रेल्वेतील महागडे जेवण घेऊ शकत नसल्याने ते रेल्वेत समोसा, सँडविच घेऊन आपले आणि मुलांचे पोट भरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेल्वेतील जेवणच नव्हे तर समोसा, सँडविचही चांगलेच भाव खात असल्याने हे खरेदी करून खाणे या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिणामी पोटाची आग पोटात मारून त्यांना प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आहे.

विशेष म्हणजे, रेल्वे बोर्डाने रेल्वे स्थानकावर विकले जाणारे समोसे, डोसा, ब्रेड पकोडा, अंडा बिर्यानी, तसेच थालीचे दर निर्धारित करण्याचे अधिकार झोनल रेल्वेला सोपविले आहेत. मध्य रेल्वेच्या झोनल ऑफिसने रेल्वेत विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची किंमत १० जुलैपासून वाढवली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारचे खाद्य पदार्थ महाग झाले आहेत.

खाद्य पदार्थ आधीचे दर आताचे दर

समोसा आधी ३० रुपये आता चाळीस रुपये प्लेट

डोसा आधी २० ते २५ रुपये आता ५० रुपये

पनीर पकोडा आधी ३० आता ५० रुपये

वेज बर्गर आधी २८ रुपये आता ४० रुपये

ईडली आधी ३० रुपये आता ४० रुपये

 

---- प्रवासी संघटना पदाधिकारी म्हणतात...

रेल्वेत सर्वच श्रेणीतील प्रवासी प्रवास करतात. त्यात अनेक जण गरीब असतात. मुलाबाळांसह ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी (कामाच्या शोधात) जातात. आधीच त्यांची स्थिती बिकट असते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या बिचाऱ्यांचा विचार करून खाण्यापिण्याच्या पदार्थांचे भाव वाढवू नये, असे मत भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मांडले आहे.

प्रवासी म्हणतात...

तीव्र आर्थिक कोंडीमुळे पोट भरण्याची गावात सोय नसल्याने आम्ही आपले गाव, घरदार आणि नातेवाईक सोडून दूर कुठेतरी जातो. तेथे जाण्यासाठी तिकिटाचे पैसे जमावे म्हणून असले नसले विकून टाकतो. प्रवासात मोठी माणसं कशीबशी भुकेची आग सहन करतात. मात्र, लहान मुलांचे काय. सरकारने, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खाद्य पदार्थांचे भाव वाढविताना किमान एवढा तरी विचार करावा, अशा मार्मिक प्रतिक्रिया भिलाई येथील सोनू अदामी आणि कोलकाता येथील किरपाल बनीक यांच्यासह विविध प्रवाशांनी दिल्या.

..तर कारवाई करू

झोनल ऑफिसच्या आदेशानुसार खाद्यपदार्थांचे दर १० जुलै २०२१ ला वाढविण्यात आले आहे. त्यानंतर कसलीही दरवाढ झाली नाही. मात्र, त्या दरांपेक्षा जास्त पैसे घेऊन खाद्यपदार्थ विकत असल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू !

कृष्णनाथ पाटील, सिनिअर डीसीएम, सेंट्रल रेल्वे, नागपूर

टॅग्स :foodअन्नIndian Railwayभारतीय रेल्वे