शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

समता प्रतिष्ठान आत्मनिर्भर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे महत्त्व कुठेही कमी होणार नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे महत्त्व कुठेही कमी होणार नाही, उलट हे प्रतिष्ठान आणखी मजबूत, सक्षम व आत्मनिर्भर करण्यात येणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

सामाजिक न्याय विभागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. या दरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. निधी नसल्याच्या कारणावरून समता प्रतिष्ठान बंद करण्यात येत असल्याची तसेच बार्टीचे महत्त्व कमी होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी ही बाब स्पष्टपणे खोडून काढली. नारनवरे म्हणाले, बंद करण्याचा प्रश्नच येत नााही. उलट समता प्रतिष्ठानच्या सक्षमीकरणासाठी आम्ही काम करीत आहोत. यासाठी आम्ही एक आराखडाही तयार केला आहे. प्रतिष्ठानला शासकीय निधीची गरजच पडून नये, यासाठी विविध उत्पन्नाच्या साधनांचा विचार केला जात आहे. सीएसआर, केंद्र सरकारकडून येणारा निधी. तसेच विविध प्रशिक्षणातून उत्पन्न कसे निर्माण करता येईल, यावर भर दिला जात आहे. उत्पन्नाचे वितरण कसे होणार यावरही काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.

बॉक्स

निधी लवकरच मंजूर होणार

समाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत समता प्रतिष्ठानच्या निधीबाबत निर्णय घेण्यात येणार असून लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचे नारनवरे यांनी सांगितले.