शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 10:08 PM

Nagpur News महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्देअखिल भारतीय महिला चरित्र कोशाचे लोकार्पण

नागपूर : भारतीय परंपरेत महिलांना मातृशक्तीचे स्थान दिले असले तरी दोन हजार वर्षांत विविध आक्रमणांमुळे महिलांची हवी तशी प्रगती होऊ शकली नाही. सार्वजनिक जीवनात राहून महिला यशाचे शिखर गाठू शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. महिलांचा उद्धार करण्याची भाषा पुरुष करतात; परंतु महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघमित्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला चरित्र कोशाच्या पहिल्या खंडाचे बुधवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, डॉ. विद्या देवधर, डॉ. मेघा ब्रह्मापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर महिला सक्षमीकरण आवश्यकच आहे. मात्र जी गोष्ट लहान मुलांना समजते ती अनेकदा मोठे लोक आचरणात आणत नाही. महिलांच्या उद्धारासाठी व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. मात्र देशातील विविधता पाहता भारतातील महिलांच्या समस्या, त्यावरील उपाय वेगवेगळे आहेत. जगात महिला श्रेष्ठ की पुरुष यावर चर्चा होते. मात्र, आपल्या प्राचीन संस्कृतीत दोघांनाही समान स्थान देण्यात आले होते. परकीय आक्रमणानंतर आपण महिलांचे श्रेष्ठत्व विसरत गेलो. मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांच्या घरात मातृशक्तीचे स्थान अबाधित आहे का, याचा विचार करायला हवा. मातृशक्ती उत्थान हा खरे तर पुरुषांच्याच प्रबोधनाचा विषय आहे. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरापासूनच व्हावी, असे सरसंघचालक म्हणाले.

देशातील महिलांमध्ये पृथ्वीसारखी सहनशीलता आहे. सामान्य घरातील गृहिणींमध्येदेखील असामान्य कर्तृत्व असते. जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करणे हा भारतीय महिलांचा गुण आहे. भारतीय महिलांचा आदर्श जगभरात पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रेरणादायी चरित्रे अभ्यासक्रमातून शिकविली गेली पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या. चित्रा जोशी यांनी पुस्तक परिचय केला.

भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन

आपल्या देशाचा इतिहास प्रेरणादायी होता. मात्र, इंग्रजांच्या काळात भूतकाळाला दूषणे देण्याचे चलन सुरू झाले व ती फॅशन झाली. आजच्या अनेक घटनांनादेखील भूतकाळाशी जोडण्यात येते. आपल्या कुटुंब व्यवस्थेला लोक नावे ठेवत होते. मात्र, आज जगभरात आपल्या कुटुंब व्यवस्थेवर अभ्यास होत आहे. भारतीय संस्कृतीबाबत आपला दृष्टिकोन चुकला असल्याची जाणीव आता पाश्चिमात्यांना होत आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत