शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

जिल्हा प्रशासनाची शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:05 IST

जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके

जिल्हाधिकारी कुर्वे, आ.सोले, कोहळे यांनीही अर्पण केली श्रद्धांजली नागपूर : जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके या दोन्ही जवानांना मंगळवारी नागपूर विमानतळावर सैन्यदलासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दोन्ही जवानांचे पार्थिव हवाईमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास या दोन्ही जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले.१९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास विकास कुळमेथे यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह यांनी पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंटर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. तर विकास उईके यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी वायुसेनेच्या विमानाने नागपुरात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शासकीय बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या त्यानुसार जिल्हा प्रशासनाततर्फे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टन दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)कामठी येथे कुळमेथे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीमंगळवारी सकाळी ६.३० वाजता शहीद विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे सैन्यदलातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग आॅफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण केले.शहिदांना ‘गार्ड आॅफ आॅनर’नागपूर विमानतळावर सैन्यदलातर्फे शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यात आले. नायब सुभेदार जय लाल, जवान चंदन राम, अरविंद यादव, महेंद्र सिंह, विनोदकुमार, हनुमान यादव, उगले मुगले विष्णू अर्जुन, डी. श्रीकांत यांनी शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले. विकास कुळमेथे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुरड गावाचे तर विकास उईके यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव हे आहे.