शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जिल्हा प्रशासनाची शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:05 IST

जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके

जिल्हाधिकारी कुर्वे, आ.सोले, कोहळे यांनीही अर्पण केली श्रद्धांजली नागपूर : जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके या दोन्ही जवानांना मंगळवारी नागपूर विमानतळावर सैन्यदलासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दोन्ही जवानांचे पार्थिव हवाईमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास या दोन्ही जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले.१९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास विकास कुळमेथे यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह यांनी पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंटर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. तर विकास उईके यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी वायुसेनेच्या विमानाने नागपुरात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शासकीय बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या त्यानुसार जिल्हा प्रशासनाततर्फे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टन दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)कामठी येथे कुळमेथे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीमंगळवारी सकाळी ६.३० वाजता शहीद विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे सैन्यदलातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग आॅफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण केले.शहिदांना ‘गार्ड आॅफ आॅनर’नागपूर विमानतळावर सैन्यदलातर्फे शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यात आले. नायब सुभेदार जय लाल, जवान चंदन राम, अरविंद यादव, महेंद्र सिंह, विनोदकुमार, हनुमान यादव, उगले मुगले विष्णू अर्जुन, डी. श्रीकांत यांनी शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले. विकास कुळमेथे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुरड गावाचे तर विकास उईके यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव हे आहे.