शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींच्या समर्पणभावाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:01 IST

अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.

ठळक मुद्देअडचणीतील प्रवाशांना देतात विनाशुल्क सेवा

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.अडचणीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील कुली तत्पर असतात. मागील महिनाभरात घडलेल्या दोन घटनांनी कुलींचा सेवाभाव समोर आला. ७ जूनला पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये बिघाड झाला. एसी दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रशासनाने नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वाखाली सुशील अवतार, सोनु गायकवाड, लखन लाल सैनी, नौशाद खान, नफीस अहमद, छोटे खान, अमर सिंह जोगी, नितीन बारामती आदी कुलींनी नि:शुल्क सेवा देत एक रुपयाही न घेता सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये पोहोचविले. कुलींच्या सेवेबद्दल प्रवाशांनीही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. ही एकच घटना नव्हे तर १५ दिवसांपूूर्वी गोरखपूर-यशवंतपूर गाडीचे चाक तुटल्यानंतर ही गाडी सोनखांब-कोहळी स्थानकादरम्यान तब्बल ५ तास जागेवरच उभी होती. या गाडीचे चाक तुटलेल्या कोचमधील प्रवाशांचे सामानही कुलींनी विनाशुल्क हलविण्यास मदत केली होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर असंख्य वेळा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली करत राहतात. पैशासाठी एकमेकांचा गळा कापण्याच्या युगात कुलींचा हा सेवाभाव समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.

११ लाखाचे दागिने केले होते परतदोन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील कडील भागात एक महिला आपली बॅग पोलीस बुथजवळ विसरली.बराच वेळ होऊन सुटकेसजवळ कोणीच येत नसल्याचे पाहून कुली अब्दुल मजीद यांनी ती सुटकेस आपल्या ताब्यात घेतली. बॅगमध्ये वाजत असलेला मोबाईल उचलून संबंधीत महिलेला बॅग आपल्याजवळ असल्याचे सांगितले. ती महिला आल्यानंतर त्या बॅगमध्ये ११ लाखाचे दागिने असल्याचे समजले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर