शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५५ हजार फळ कलमांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध फळझाडांच्या कलमांना राज्यभरात भरीव मागणी आहे. यावर्षी या केंद्रातून २२ लाख ३६ हजार ६१५ रुपये किमतीच्या ५५ हजार कलमांची विक्री करण्यात आली, अशी माहिती या संशाेधन केंद्राचे प्रमुख डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या फळ संशाेधन केंद्रात संत्रा, माेसंबी, पेरु, लिंबू, सीताफळ, आंबा, करवंद या फळझाडांच्या कलमा तयार केल्या जात असून, यातील संत्रा, माेसंबी, पेरुच्या कलमांना माेठी मागणी आहे. चालू हंगामात नागपुरी संत्र्याच्या १७,०००, काटोल गोल्ड मोसंबीच्या १९,०००,न्यूसेलर माेसंबीच्या ३,०००, पेरुच्या ६,०००, लिंबाच्या ३,०००, सीताफळाच्या २,००० आणि करवंदाच्या १,००० अशा एकूण ५५,००० कलमा विकण्यात आल्याची माहिती डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या सर्व कलमा राज्यातील धुळे, बारामती (जिल्हा पुणे), नाशिक, नांदेड, अहमदनर, वाशिम, बुलडाणा, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील दाेन हजार शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. संत्रा या लिंबूवर्गीय फळावर संशाेधन करणारे हे राज्यात एकमेव संशाेधन केंद्र आहे. याचा फाॅर्म काटाेल-काेंढाळी मार्गावर आहे. कर्मचारी, निधी व मजुरांची कमतरता जाणवत असल्याने संशाेधनात अडचणी येत असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी स्पष्ट केले. दर्जेदार, राेगमुक्त व अधिक काळ फळांचे उत्पादन शेतकऱ्यांनी याेग्य प्रक्रिया केलेल्या परिपक्व कलमांची खरेदी करावी, असे आवाहन केले.

...

पाॅलिहाऊसचा वापर

या संशाेधन केंद्रात दरवर्षी जमिनीवर कलमा तयार केल्या जायच्या. यावर्षी पहिल्यांना सहा पाॅलिहाऊस तयार करून त्यात कलमांची निर्मिती करण्यात आली. पिशवीमध्ये संत्र्याच्या ७,०००, माेसंबीच्या ४,००० व लिंबाच्या २,००० कलमा तयार करण्यात आल्या. दर्जेदार व निकाेप कलमांची निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणे हा या संशाेधन केंद्राचा मूळ उद्देश असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.

...

मातृवृक्षाच्या दर्जावर भर

फळझाडांच्या कलमा तयार करताना मातृवृक्षाचा दर्जा सांभाळण्यावर विशेष भर दिला जाताे. या बाबी खासगी राेपवाटिका मालक करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार कलमा मिळत नसल्याने त्यांचे नुकसान हाेते. कलमा तयार करताना उत्कृष्ट मातृवृक्षाची निवड करून त्यावर कलम तयार केली जाते. निराेगी राहण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय, कलमा परिपक्व झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जात असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.