शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

५५ हजार फळ कलमांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध फळझाडांच्या कलमांना राज्यभरात भरीव मागणी आहे. यावर्षी या केंद्रातून २२ लाख ३६ हजार ६१५ रुपये किमतीच्या ५५ हजार कलमांची विक्री करण्यात आली, अशी माहिती या संशाेधन केंद्राचे प्रमुख डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या फळ संशाेधन केंद्रात संत्रा, माेसंबी, पेरु, लिंबू, सीताफळ, आंबा, करवंद या फळझाडांच्या कलमा तयार केल्या जात असून, यातील संत्रा, माेसंबी, पेरुच्या कलमांना माेठी मागणी आहे. चालू हंगामात नागपुरी संत्र्याच्या १७,०००, काटोल गोल्ड मोसंबीच्या १९,०००,न्यूसेलर माेसंबीच्या ३,०००, पेरुच्या ६,०००, लिंबाच्या ३,०००, सीताफळाच्या २,००० आणि करवंदाच्या १,००० अशा एकूण ५५,००० कलमा विकण्यात आल्याची माहिती डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या सर्व कलमा राज्यातील धुळे, बारामती (जिल्हा पुणे), नाशिक, नांदेड, अहमदनर, वाशिम, बुलडाणा, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील दाेन हजार शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. संत्रा या लिंबूवर्गीय फळावर संशाेधन करणारे हे राज्यात एकमेव संशाेधन केंद्र आहे. याचा फाॅर्म काटाेल-काेंढाळी मार्गावर आहे. कर्मचारी, निधी व मजुरांची कमतरता जाणवत असल्याने संशाेधनात अडचणी येत असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी स्पष्ट केले. दर्जेदार, राेगमुक्त व अधिक काळ फळांचे उत्पादन शेतकऱ्यांनी याेग्य प्रक्रिया केलेल्या परिपक्व कलमांची खरेदी करावी, असे आवाहन केले.

...

पाॅलिहाऊसचा वापर

या संशाेधन केंद्रात दरवर्षी जमिनीवर कलमा तयार केल्या जायच्या. यावर्षी पहिल्यांना सहा पाॅलिहाऊस तयार करून त्यात कलमांची निर्मिती करण्यात आली. पिशवीमध्ये संत्र्याच्या ७,०००, माेसंबीच्या ४,००० व लिंबाच्या २,००० कलमा तयार करण्यात आल्या. दर्जेदार व निकाेप कलमांची निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणे हा या संशाेधन केंद्राचा मूळ उद्देश असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.

...

मातृवृक्षाच्या दर्जावर भर

फळझाडांच्या कलमा तयार करताना मातृवृक्षाचा दर्जा सांभाळण्यावर विशेष भर दिला जाताे. या बाबी खासगी राेपवाटिका मालक करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार कलमा मिळत नसल्याने त्यांचे नुकसान हाेते. कलमा तयार करताना उत्कृष्ट मातृवृक्षाची निवड करून त्यावर कलम तयार केली जाते. निराेगी राहण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय, कलमा परिपक्व झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जात असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.