शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

५५ हजार फळ कलमांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध फळझाडांच्या कलमांना राज्यभरात भरीव मागणी आहे. यावर्षी या केंद्रातून २२ लाख ३६ हजार ६१५ रुपये किमतीच्या ५५ हजार कलमांची विक्री करण्यात आली, अशी माहिती या संशाेधन केंद्राचे प्रमुख डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या फळ संशाेधन केंद्रात संत्रा, माेसंबी, पेरु, लिंबू, सीताफळ, आंबा, करवंद या फळझाडांच्या कलमा तयार केल्या जात असून, यातील संत्रा, माेसंबी, पेरुच्या कलमांना माेठी मागणी आहे. चालू हंगामात नागपुरी संत्र्याच्या १७,०००, काटोल गोल्ड मोसंबीच्या १९,०००,न्यूसेलर माेसंबीच्या ३,०००, पेरुच्या ६,०००, लिंबाच्या ३,०००, सीताफळाच्या २,००० आणि करवंदाच्या १,००० अशा एकूण ५५,००० कलमा विकण्यात आल्याची माहिती डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.

या सर्व कलमा राज्यातील धुळे, बारामती (जिल्हा पुणे), नाशिक, नांदेड, अहमदनर, वाशिम, बुलडाणा, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील दाेन हजार शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. संत्रा या लिंबूवर्गीय फळावर संशाेधन करणारे हे राज्यात एकमेव संशाेधन केंद्र आहे. याचा फाॅर्म काटाेल-काेंढाळी मार्गावर आहे. कर्मचारी, निधी व मजुरांची कमतरता जाणवत असल्याने संशाेधनात अडचणी येत असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी स्पष्ट केले. दर्जेदार, राेगमुक्त व अधिक काळ फळांचे उत्पादन शेतकऱ्यांनी याेग्य प्रक्रिया केलेल्या परिपक्व कलमांची खरेदी करावी, असे आवाहन केले.

...

पाॅलिहाऊसचा वापर

या संशाेधन केंद्रात दरवर्षी जमिनीवर कलमा तयार केल्या जायच्या. यावर्षी पहिल्यांना सहा पाॅलिहाऊस तयार करून त्यात कलमांची निर्मिती करण्यात आली. पिशवीमध्ये संत्र्याच्या ७,०००, माेसंबीच्या ४,००० व लिंबाच्या २,००० कलमा तयार करण्यात आल्या. दर्जेदार व निकाेप कलमांची निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणे हा या संशाेधन केंद्राचा मूळ उद्देश असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.

...

मातृवृक्षाच्या दर्जावर भर

फळझाडांच्या कलमा तयार करताना मातृवृक्षाचा दर्जा सांभाळण्यावर विशेष भर दिला जाताे. या बाबी खासगी राेपवाटिका मालक करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार कलमा मिळत नसल्याने त्यांचे नुकसान हाेते. कलमा तयार करताना उत्कृष्ट मातृवृक्षाची निवड करून त्यावर कलम तयार केली जाते. निराेगी राहण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय, कलमा परिपक्व झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जात असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.