शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

समाजमन रोगमुक्त करण्यासाठी संतांची ‘थेरपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:25 IST

समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली.

ठळक मुद्देराजन गवस : ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’वर राज्यस्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली. समाजाचे रोगनिदान करणाºया या संत पद्धतीचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वाडी येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील ग्रामगीता भवनात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे तसेच माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य जीवन दोंतुलवार, मराठी विभागप्रमुख डॉ. कल्पना बोरकर हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. स्वत:च्या जगण्यातील नैतिकता शब्दांत उतरवत संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी संतांनी साहित्याची वेगवेगळी उपचार पद्धत वापरली. या माध्यमातून त्यांनी लोकमानस बदलण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन गवस यांनी केले. धार्मिक, सांस्कृतिक संघर्ष होत असताना संतांनी भक्तिचळवळ उभारली होती. ती तेव्हाच्या काळाची गरज होती.व्यवस्थेचा विरोध करून समाजाला जोडण्याचा प्रयत्न करणाºया संतांची ही बंडखोरीच होती. संत साहित्य हे केवळ अध्यात्म व धर्मापुरते मर्यादित नाही तर ते संतांच्या चळवळीचे प्रभावी साहित्य होते. संतांनादेखील समाजाने नाकारले नाही तर सर्वांनी त्यांना समान वागणूक दिली, अशी भूमिका बीजभाषणादरम्यान प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी मांडली.या चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध संशोधक डॉ. अशोक राणा होते तर डॉ. अलका गायकवाड, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी शोधनिबंध सादर केला. सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक जीवन दोंतुलवार यांनी केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभार मानले....तर संस्कृत का लादायचे ?नागपूर विद्यापीठासोबतच संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार सांभाळणाºया डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी संस्कृत भाषेसंदर्भात मतप्रदर्शन केले. रामटेक येथे कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारत असताना संस्कृत मंत्रोच्चार करण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मला यातील एकाचाही अर्थ समजला नाही. अशीच अवस्था इतरांचीदेखील होती. जर समजतच नसेल तर संस्कृत लादणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंड होतेयावेळी डॉ.अक्षयकुमार काळे यांनी आपली भूमिका मांडली. धर्मव्यवस्था ही समाजाच्या हितासाठीच होती. मात्र त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंडदेखील होते. त्याकाळी पुरोहितशाही बळावली होती. संस्कृत भाषेतील ज्ञान पुरोहितांपुरतेच मर्यादित राहिले. ही मक्तेदारी संपवण्यासाठी तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार खालच्या मानल्या जाणाºया वर्गातील संतांनी बंड पुकारले. महाराष्ट्रीयन संत परंपरा म्हणजे स्त्री आणि क्षुद्रांचे संमेलनच होते. संतांमध्ये बहुजनांविषयी कळवळा व जिव्हाळा होता, असे डॉ. काळे म्हणाले.