शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सुरक्षित रक्ताची हमी असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देअभिमन्यू निसवाडे : ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु रक्तपेढी ते रुग्णाला रक्त लावेपर्यंतची जी सुरक्षा आहे, त्याची हमी परिचारिकेपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग व इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्यूजन मेडिसीन अ‍ॅण्ड ब्लड बँक फेडरेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ या संकल्पनेवर आधारित ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे आयोजन मेडिकलमध्ये करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी ड्रग कंट्रोलर (मुंबई) डॉ. के. बंगारुराजन, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. मोहन केकतपुरे, डॉ. डी. एस. कुंभलकर, डॉ. संजय पराते उपस्थित होते. डॉ. निसवाडे म्हणाले, डॉक्टरांनी रक्ताचे प्रिस्क्रिप्शन देताना काळजी घ्यायला हवी. रुग्णाला किती रक्त हवे, कोणते हवे आहे याचा अभ्यास करून तसे प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.शासकीय रक्तपेढ्यांचा विकास होणे गरजेचेडॉ. संजयकुमार जाधव म्हणाले, प्रगत देशांमध्ये रक्तपेढींचे ‘केंद्रीकरण’ करण्यात आले आहे. यामुळे तिथे रक्ताच्या गुणवत्तेपासून ते इतर सोयी पुरविण्यात अडचणी येत नाही. या उलट आपल्याकडे रक्तपेढीचे ‘विकेंद्रीकरण’ झाले आहे. यामुळे मनुष्यबळापासून ते रक्तांच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाने शासकीय रक्तपेढ्यांचा विकास करायला हवा. या रक्तपेढ्यांना प्रादेशिक दर्जा मिळायला हवा.रॅपीड टेस्ट टाळाडॉ. के. बंगारुराजन यांनी, रक्तपेढीला लागणारी जागा, उपकरणे, कायदा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, रक्तपेढ्यांनी रक्ताच्या गुणवत्तेला घेऊन नेहमीच जागरुक रहावे. विशेषत: वेळ कमी असल्याचे कारण देऊन रक्ताची ‘रॅपीड टेस्ट’ करू नये. कारण त्याचे रिझल्ट योग्य येत नाही. कागदोपत्री पुरवा राहात नाही. यामुळे नियमानुसार ‘एलायझा’ चाचणीच करावी. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांनी रक्तपेढीत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. कीर्ती जयस्वाल व डॉ. सुखनिक खुराणा यांनी केले तर आभार डॉ. शीला मुंधडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. व्ही.आर. रवी, डॉ. हरीश वरभे, अशोक पत्की आदींनी सहकार्य केले.