शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुरक्षित रक्ताची हमी असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देअभिमन्यू निसवाडे : ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु रक्तपेढी ते रुग्णाला रक्त लावेपर्यंतची जी सुरक्षा आहे, त्याची हमी परिचारिकेपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग व इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्यूजन मेडिसीन अ‍ॅण्ड ब्लड बँक फेडरेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ या संकल्पनेवर आधारित ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे आयोजन मेडिकलमध्ये करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी ड्रग कंट्रोलर (मुंबई) डॉ. के. बंगारुराजन, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. मोहन केकतपुरे, डॉ. डी. एस. कुंभलकर, डॉ. संजय पराते उपस्थित होते. डॉ. निसवाडे म्हणाले, डॉक्टरांनी रक्ताचे प्रिस्क्रिप्शन देताना काळजी घ्यायला हवी. रुग्णाला किती रक्त हवे, कोणते हवे आहे याचा अभ्यास करून तसे प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.शासकीय रक्तपेढ्यांचा विकास होणे गरजेचेडॉ. संजयकुमार जाधव म्हणाले, प्रगत देशांमध्ये रक्तपेढींचे ‘केंद्रीकरण’ करण्यात आले आहे. यामुळे तिथे रक्ताच्या गुणवत्तेपासून ते इतर सोयी पुरविण्यात अडचणी येत नाही. या उलट आपल्याकडे रक्तपेढीचे ‘विकेंद्रीकरण’ झाले आहे. यामुळे मनुष्यबळापासून ते रक्तांच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाने शासकीय रक्तपेढ्यांचा विकास करायला हवा. या रक्तपेढ्यांना प्रादेशिक दर्जा मिळायला हवा.रॅपीड टेस्ट टाळाडॉ. के. बंगारुराजन यांनी, रक्तपेढीला लागणारी जागा, उपकरणे, कायदा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, रक्तपेढ्यांनी रक्ताच्या गुणवत्तेला घेऊन नेहमीच जागरुक रहावे. विशेषत: वेळ कमी असल्याचे कारण देऊन रक्ताची ‘रॅपीड टेस्ट’ करू नये. कारण त्याचे रिझल्ट योग्य येत नाही. कागदोपत्री पुरवा राहात नाही. यामुळे नियमानुसार ‘एलायझा’ चाचणीच करावी. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांनी रक्तपेढीत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. कीर्ती जयस्वाल व डॉ. सुखनिक खुराणा यांनी केले तर आभार डॉ. शीला मुंधडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. व्ही.आर. रवी, डॉ. हरीश वरभे, अशोक पत्की आदींनी सहकार्य केले.