शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सुरक्षित रक्ताची हमी असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देअभिमन्यू निसवाडे : ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु रक्तपेढी ते रुग्णाला रक्त लावेपर्यंतची जी सुरक्षा आहे, त्याची हमी परिचारिकेपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग व इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्यूजन मेडिसीन अ‍ॅण्ड ब्लड बँक फेडरेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ या संकल्पनेवर आधारित ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे आयोजन मेडिकलमध्ये करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी ड्रग कंट्रोलर (मुंबई) डॉ. के. बंगारुराजन, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. मोहन केकतपुरे, डॉ. डी. एस. कुंभलकर, डॉ. संजय पराते उपस्थित होते. डॉ. निसवाडे म्हणाले, डॉक्टरांनी रक्ताचे प्रिस्क्रिप्शन देताना काळजी घ्यायला हवी. रुग्णाला किती रक्त हवे, कोणते हवे आहे याचा अभ्यास करून तसे प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.शासकीय रक्तपेढ्यांचा विकास होणे गरजेचेडॉ. संजयकुमार जाधव म्हणाले, प्रगत देशांमध्ये रक्तपेढींचे ‘केंद्रीकरण’ करण्यात आले आहे. यामुळे तिथे रक्ताच्या गुणवत्तेपासून ते इतर सोयी पुरविण्यात अडचणी येत नाही. या उलट आपल्याकडे रक्तपेढीचे ‘विकेंद्रीकरण’ झाले आहे. यामुळे मनुष्यबळापासून ते रक्तांच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाने शासकीय रक्तपेढ्यांचा विकास करायला हवा. या रक्तपेढ्यांना प्रादेशिक दर्जा मिळायला हवा.रॅपीड टेस्ट टाळाडॉ. के. बंगारुराजन यांनी, रक्तपेढीला लागणारी जागा, उपकरणे, कायदा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, रक्तपेढ्यांनी रक्ताच्या गुणवत्तेला घेऊन नेहमीच जागरुक रहावे. विशेषत: वेळ कमी असल्याचे कारण देऊन रक्ताची ‘रॅपीड टेस्ट’ करू नये. कारण त्याचे रिझल्ट योग्य येत नाही. कागदोपत्री पुरवा राहात नाही. यामुळे नियमानुसार ‘एलायझा’ चाचणीच करावी. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांनी रक्तपेढीत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. कीर्ती जयस्वाल व डॉ. सुखनिक खुराणा यांनी केले तर आभार डॉ. शीला मुंधडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. व्ही.आर. रवी, डॉ. हरीश वरभे, अशोक पत्की आदींनी सहकार्य केले.