शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

वन कर्मचाऱ्यांचे बलिदान प्रेरणादायी

By admin | Updated: September 12, 2016 03:04 IST

मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वन हुतात्मा दिन : वनबल प्रमुखांचे प्रतिपादन नागपूर : मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. यात वनविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. मात्र अनेकदा संरक्षण करीत असतांना काही आव्हानात्मक स्थितीत वन कर्मचारी वा अधिकाऱ्यांना जीवाचे बलिदान द्यावे लागते. त्यांचे ते बलिदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी केले. वन विभागाच्यावतीने राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त रविवारी सिव्हिल लाईन्स येथील वन मुख्यालयात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए. एस. के. सिन्हा, प्रधान मुख्य वनसंरक्षक व व्यवस्थापकीय संचालक सुरेश गैरोला, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) डॉ. दिलीप सिंह, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व्यवस्थापन) सुनिता सिंह, मुख्य वनसंरक्षक (मानव संसाधन) यशवीर सिंह व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी उपस्थित होते. यावेळी वन विभाग आणि जेसीआय नाग विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. भारतीय इतिहासानुसार ११ सप्टेंबर १९३८ या दिवशी खेजरली गावातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तींनी खेडजी या वृक्षाच्या संरक्षणासाठी बलिदान दिले होते. तेव्हापासून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यात सुध्दा वनविभागातील २५ वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षाची जबाबदारी पार पाडतांना जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्यावतीने नागपुरातील वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. रविवारी या स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)