शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वन कर्मचाऱ्यांचे बलिदान प्रेरणादायी

By admin | Updated: September 12, 2016 03:04 IST

मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वन हुतात्मा दिन : वनबल प्रमुखांचे प्रतिपादन नागपूर : मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. यात वनविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. मात्र अनेकदा संरक्षण करीत असतांना काही आव्हानात्मक स्थितीत वन कर्मचारी वा अधिकाऱ्यांना जीवाचे बलिदान द्यावे लागते. त्यांचे ते बलिदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी केले. वन विभागाच्यावतीने राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त रविवारी सिव्हिल लाईन्स येथील वन मुख्यालयात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए. एस. के. सिन्हा, प्रधान मुख्य वनसंरक्षक व व्यवस्थापकीय संचालक सुरेश गैरोला, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) डॉ. दिलीप सिंह, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व्यवस्थापन) सुनिता सिंह, मुख्य वनसंरक्षक (मानव संसाधन) यशवीर सिंह व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी उपस्थित होते. यावेळी वन विभाग आणि जेसीआय नाग विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. भारतीय इतिहासानुसार ११ सप्टेंबर १९३८ या दिवशी खेजरली गावातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तींनी खेडजी या वृक्षाच्या संरक्षणासाठी बलिदान दिले होते. तेव्हापासून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यात सुध्दा वनविभागातील २५ वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षाची जबाबदारी पार पाडतांना जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्यावतीने नागपुरातील वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. रविवारी या स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)