शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पीएम किसान योजनेच्या सन्मानातून ग्रामविकास विभाग बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:14 IST

नागपूर : महसूल विभागातील तलाठी व नायब तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत ग्रामसेवकांनीही नाराजी व्यक्त केली ...

नागपूर : महसूल विभागातील तलाठी व नायब तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत ग्रामसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पीएम किसान योजनेत महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने समन्वयातून काम केले. पण श्रेय कृषी विभागाने लोटून नेले. त्यामुळे महसूल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या पीएम किसान योजनेचे काम ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी समान प्रमाणात केले. राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची संख्या लक्षात घेता सर्वात जास्त काम ग्रामसेवकांनी केले. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी व जिल्हा पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची समन्वयाची जबाबदारी पार पाडली. पीएम किसान योजनेत महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय काम केले. पण केंद्र सरकारने कृषी विभागाचाच सत्कार केला. ग्रामविकास विभागाचा साधा उल्लेखही केला नाही, त्यामुळे ग्रामसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामविकास विभागाच्या परवानगीशिवाय महसूल व इतर विभागाने ग्रामसेवक संवर्गास काम सांगू नये, अशी भावना ग्रामसेवक संघाचे राज्य उपाध्यक्ष रविकांत रेहपाडे यांनी व्यक्त केले.