शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

आठवडाभरात चालते व्हा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी व अभ्यागत अवैधपणे राहत असल्याची अनेकदा ओरड होते.

ठळक मुद्देवसतिगृहात अवैध पद्धतीने राहणाºयांना नोटीस : नागपूर विद्यापीठाचे कडक धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी व अभ्यागत अवैधपणे राहत असल्याची अनेकदा ओरड होते. पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा यासाठी विद्यापीठाने २०१६ पासून केंद्रीय प्रवेश पद्धत सुरू केली. मात्र तरीदेखील विधी विद्यापीठ परिसरात असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात काही जण अवैध पद्धतीनेच राहत असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने कडक पवित्रा घेतला असून आठवडाभरात वसतिगृह रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे. वसतिगृहात याबाबत नोटीसदेखील लावण्यात आली असून १२ आॅक्टोबरनंतर थेट सुरक्षारक्षक कारवाई करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. बाहेरील विद्यार्थी येथे राहत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. यासंदर्भात पावले उचलत विद्यापीठाने येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली होती.कोणत्या अभ्यासक्रमाचा कुठला विद्यार्थी कुठल्या खोलीमध्ये राहतो, इतकी ही सविस्तर माहिती होती. त्यापुढे जाऊन आता अशा प्रकारांना चाप लागावा, यासाठी प्रवेशप्रक्रियेची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली.वसतिगृहांची सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने मागील शैक्षणिक सत्रात विशेष समिती नेमली होती. या समितीने ज्यावेळी विधी विद्यापीठ परिसरातील वसतिगृहाची पाहणी केली तेव्हा प्रवेशित नसलेले अनेक विद्यार्थी तसेच अभ्यागत तेथे राहत असल्याचे आढळून आले होते. यंदादेखील वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व खोल्या भरल्या आहेत.एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी असतानादेखील काही ठिकाणी चार ते पाच विद्यार्थी राहत आहेत. अवैध पद्धतीने राहणाºया विद्यार्थ्यांमुळे नियमित विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाल्या.यासंदर्भात विद्यापीठाने एक नोटीसच जारी केली आहे. अवैध पद्धतीने राहणारे विद्यार्थी व अभ्यागतांनी १२ आॅक्टोबरपर्यंत वसतिगृह रिकामे करावे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या माध्यमातून बजावण्यात आले आहे.सुरक्षा रक्षकांची घेणार मदतसद्यस्थितीत नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातर्फे संचालित ‘एमएसएफ’चे (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ९ आॅक्टोबरपासून ‘एमएसएफ’चे सुरक्षा रक्षक वसतिगृहांमध्येदेखील तैनात करण्यात येतील. १२ आॅक्टोबरपासून ते अवैध पद्धतीने राहणाºया विद्यार्थ्यांना बाहेर काढतील, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय का ?बाहेरगावाहून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही विद्यार्थी येथे वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. नियमांनुसार नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र वारंवार विनंती करूनदेखील अवैध पद्धतीने काही विद्यार्थी व अभ्यागत येथे राहत आहेत. त्यांच्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांनी त्रास व अन्याय का सहन करायचा, असा प्रश्न कुलगुरूंनी केला. अवैध पद्धतीने राहणाºयांना वसतिगृह रिकामे करण्यासाठी आम्ही पुरेसा कालावधी दिला आहे. विद्यार्थी संघटनांनीदेखील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.काणे यांनी केले.