शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधक ांत खडाजंगी

By admin | Updated: March 31, 2016 03:16 IST

पाच वर्षांपूर्वी नागपूर विकास आघाडीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.

मॅरेथॉन चर्चेनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी : सत्ताधाऱ्यांनी संतुलित तर विरोधकांनी काल्पनिक ठरविलेनागपूर : पाच वर्षांपूर्वी नागपूर विकास आघाडीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला तर अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्पातील प्रस्तावित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न याचा कोठेही ताळमेळ नाही. अर्थसंकल्प काल्पनिक आहे. पाच वर्षापूर्वी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता सत्ताधाऱ्यांनी केलेली नाही, असा आरोप करीत काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी सभात्याग करीत अर्थसंकल्पाला विरोध दर्शविला. महाल येथील टाऊ न हॉल येथे बुधवारी महापालिकेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावर आयोजित चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाली.महापौर प्रवीण दटके यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली तेव्हा सभागृहात विरोधकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नागुलवार, दुनेश्वर पेठे व कामील अंसारी हे तीनच सदस्य उपस्थित होते. अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश नाही. जुन्याच योजना पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त करून सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन केले. आयुक्तांनी उत्पन्नाचे स्रोत विचारात घेऊ न १५३४ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु स्थायी समिती अध्यक्षांनी २०४८ कोटींचा काल्पनिक अर्थसंकल्प सादर केला. चार वर्षांपूर्वी ज्या योजनांची घोषणा केली होती, त्याच योजनांचा यात समावेश आहे. आता त्या दहा महिन्यात कशा पूर्ण करणार. टँकरमुक्त नागपूर व भ्र्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विकास ठाकरे व प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधकांनी केला.केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु शहरातील नागरिकांची करवाढीतून सुटका झालेली नाही. कोणत्याही स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षी योजना नाही. उत्पन्न वाढीचे कोणतेही नवीन स्रोत नाही. केबल डक्टच्या ५४ कोटींच्या दंडाची १४ लाखांवर तडजोड केली जाते. स्टार बस, ओसीडब्ल्यू असो की दहनघाटावरील लाकूड पुरवठा यात महापालिकेला चुना लावण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही. खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला. बंडू राऊ त यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश आहे. टँकरमुक्त शहर करण्याची घोषणा केली होती. परंतु आजही शहरात ३०० टँकर सुरू आहेत. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची घोषणा केली होती. परंतु भ्रष्टाचार लिप्त कारभार सुरू आहे. खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून दवाखाने, शॉपिंग मॉल व विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यांच्याकडून कामगारांचे शोषण सुरू आहे. कामगारांना वेतन फरकाचे १५० कोटी द्यावे लागणार आहे. भांडवली खर्चासाठी २५० कोटींच्या आसपास निधी शिल्लक राहणार असल्याने शहराचा विकास शक्य नाही. गेल्या चार वर्षात कोणतेही चांगले परिणाम दिसलेले नाही. एलबीटी बंद करताना अनुदानाची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यामुळे ही शासनाची मदत नसल्याचे प्रफुल्ल गुडधे यांनी निदर्शनास आणले.अविनाश ठाकरे यांच्या भाषणाने अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. विकास आघाडीचा संकल्प पूर्ण करणारा अर्थसंकलप आहे. गेल्या पाच वर्षात महापालिके चे उत्पन्न १०५८ कोटींनी वाढले आहे. तसेच २५०० ते २६०० कोटींची विकास कामे शहरात झाल्याचा दावा अविनाश ठाकरे यांनी केला. अगोदरच्या बजेटच्या तुलनेत मोठे बजेट देण्याची परंपरा बंडू राऊ त यांनी कायम ठेवली आहे. विकास कामात भेदभाव केला जातो. पिवळ्या नदीच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध केला जात नाही. असा आरोप सुरेश जग्याशी यांनी केला. हर्षदा साबळे यांनी गांधीसागर तलावाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार निधीची मागणी करूनही निधी दिला जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष असतानाही या निमित्ताने महापालिकेने कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्र म आयोजित केलेले नाही.आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बसपाचे गटनेते गौतम पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)