शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

आरटीओचे कामकाज ठप्प

By admin | Updated: April 12, 2017 01:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण मांडले. या धोरणामधून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली.

दोन दिवसांपासून इंटरनेट बंद : ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ प्रणालीही संथसुमेध वाघमारे नागपूरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण मांडले. या धोरणामधून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगविले. मात्र ही प्रणाली सुरू झाल्यापासून याचे सर्व्हर संथगतीने सुरू आहे. परिणामी, ‘आॅनलाईन’ अर्ज भरणे कठीण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण आरटीओ कार्यालयाचे इंटरनेटही बंद पडले आहे. यामुळे परवान्यासह, आरसी व इतरही महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत.राज्यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ ही नवी ‘वेब बेस’ प्रणाली सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील आरटीओ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये या प्रणालीद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्के वाहन परवान्यासाठी लागणाऱ्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. विशेष म्हणजे, तीनही आरटीओ कार्यालयात ही प्रणाली सुरू होऊन महिना होत असताना समस्या कायम आहेत. परवान्यासाठी ज्यांनी जुन्या प्रणालीतून अपॉर्इंटमेंट घेतली आहे, त्यांना नव्या प्रणालीत अपॉर्इंटमेंट घेण्यासाठी तारीख मिळत नाही. इतरही‘आॅनलाईन अर्ज’ भरण्यासाठी तासन्तास वाट पहाण्याची वेळ अर्जदारावर आली आहे.आॅनलाईन कामे करणाऱ्यांची दुकाने जोरातशिकाऊ परवान्यासाठी असलेली संगणक परीक्षा व पक्क्या परवान्यासाठी असलेली वाहनाची चाचणी परीक्षा सोडल्यास इतर सर्व कामे ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या वेबबेस प्रणालीमध्ये करण्याची सक्ती आहे. परिणामी, आॅनलाईन कामे करून देणाऱ्यांची दुकानदारी जोरात सुरू आहे. पूर्वी ते शिकाऊ परवान्याची तारीख घेताना ५० ते १०० रुपये घेत असत, आता प्रक्रिया बदलल्यामुळे त्यांनी २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.परवाना, आरसीची प्रतीक्षा लांबलीग्रामीण आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंद करणाऱ्यांची, वाहन परवाने घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच कमी मनुष्यबळ, वाढलेला ताण यामुळे कर्मचारीही त्रासले होते. यातच नवीन प्रणालीचा जलदगतीचा दावा फोल ठरला आहे. ‘नॅशनल इन्फोमॅटिक्स सेंटर’ या एजन्सीचे हे संकेतस्थळ अत्यंत संथ आहे. त्यामुळे वाहननोंदणी, वाहन हस्तांतरण नोंदणी इत्यादी कामांना विलंब होत आहे. यातच कार्यालयाला पुरविण्यात आलेली ‘बीएसएनएल’ची इंटरनेटची सेवा दोन दिवसांपासून खंडित झाली आहे. यामुळे परवाना, आरसीची प्रतीक्षा लांबली असून अनेकांवर कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.