शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

By योगेश पांडे | Updated: March 22, 2025 00:01 IST

बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती.

योगेश पांडेनागपूर : बांगलादेशमधीलहिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती. मात्र, तरीदेखील अजूनही तेथील हिंदूंना टार्गेट केले जात असून, त्यांच्यात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनबांगलादेशमधील अत्याचाराविरोधात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू-अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ‘ग्लोबल’ आवाज उचलला जावा, यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

शुक्रवारपासून बंगळुरू येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. या सभेत दोन प्रस्तावांवर सखोल मंथन होणार आहे. संघ स्थापनेच्या शतकवर्षानिमित्त या सभेला महत्त्व आले असून, या वर्षातील कार्यक्रमांच्या नियोजनावर, तर चर्चेला सुरुवात झालीच आहे. सोबतच बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सार्वजनिक मंचावरून याची निंदा केली होती. संघ स्वयंसेवकांनी शक्य त्या पद्धतीने तेथील हिंदू व अल्पसंख्याकांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर संघाकडून हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचे नियोजन अखिल भारतीय प्रतिनीधी सभेत करण्यात येणार आहे. जागतिक समुदायाने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, अशी संघाची भूमिका आहे व त्यादृष्टीनेच आता पुढील पावले उचलण्यात येतील.

बांगलादेशमधील घटना ही मानवतेवर काळिमासंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बांगलादेशमध्ये सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे. तेथील घटना सुसंस्कृत समाजातील मानवतेच्या आणि लोकशाहीच्या कोणत्याही मानकांनुसार लज्जास्पद आहेत. तेथील स्थिती अद्यापही गंभीर असून तेथील हिंदू व अल्पसंख्याकांनी या स्थितीतदेखील दाखविलेली हिंमत नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भूमिका संघाने मांडली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेने प्रयत्न करावे, असे आवाहन संघाकडून परत एकदा करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये मैतेई-कुकींमध्ये ‘संवादसेतू’ साधणारबांगलादेशसोबतच मणिपूरमधील हिंसाचाराबाबतदेखील संघाने चिंता व्यक्त केली आहे. तेथील विविध आदिवासी व जनजातीय समूहांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: मैतेई व कुकी समुदायाला एका मंचावर आणून त्यांच्यात संवादसेतू प्रस्थापित करण्यावर संघाकडून भर देण्यात येत आहे. दोन्ही समुदायांचे नेत्यांशी संघाचे अखिल भारतीय पातळीवरील अधिकारी संपर्कात आहेत. तसेच इंफाळ, गुवाहाटी व दिल्ली येथे बैठकादेखील झाल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू