शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

By योगेश पांडे | Updated: March 22, 2025 00:01 IST

बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती.

योगेश पांडेनागपूर : बांगलादेशमधीलहिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती. मात्र, तरीदेखील अजूनही तेथील हिंदूंना टार्गेट केले जात असून, त्यांच्यात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनबांगलादेशमधील अत्याचाराविरोधात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू-अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ‘ग्लोबल’ आवाज उचलला जावा, यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

शुक्रवारपासून बंगळुरू येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. या सभेत दोन प्रस्तावांवर सखोल मंथन होणार आहे. संघ स्थापनेच्या शतकवर्षानिमित्त या सभेला महत्त्व आले असून, या वर्षातील कार्यक्रमांच्या नियोजनावर, तर चर्चेला सुरुवात झालीच आहे. सोबतच बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सार्वजनिक मंचावरून याची निंदा केली होती. संघ स्वयंसेवकांनी शक्य त्या पद्धतीने तेथील हिंदू व अल्पसंख्याकांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर संघाकडून हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचे नियोजन अखिल भारतीय प्रतिनीधी सभेत करण्यात येणार आहे. जागतिक समुदायाने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, अशी संघाची भूमिका आहे व त्यादृष्टीनेच आता पुढील पावले उचलण्यात येतील.

बांगलादेशमधील घटना ही मानवतेवर काळिमासंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बांगलादेशमध्ये सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे. तेथील घटना सुसंस्कृत समाजातील मानवतेच्या आणि लोकशाहीच्या कोणत्याही मानकांनुसार लज्जास्पद आहेत. तेथील स्थिती अद्यापही गंभीर असून तेथील हिंदू व अल्पसंख्याकांनी या स्थितीतदेखील दाखविलेली हिंमत नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भूमिका संघाने मांडली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेने प्रयत्न करावे, असे आवाहन संघाकडून परत एकदा करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये मैतेई-कुकींमध्ये ‘संवादसेतू’ साधणारबांगलादेशसोबतच मणिपूरमधील हिंसाचाराबाबतदेखील संघाने चिंता व्यक्त केली आहे. तेथील विविध आदिवासी व जनजातीय समूहांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: मैतेई व कुकी समुदायाला एका मंचावर आणून त्यांच्यात संवादसेतू प्रस्थापित करण्यावर संघाकडून भर देण्यात येत आहे. दोन्ही समुदायांचे नेत्यांशी संघाचे अखिल भारतीय पातळीवरील अधिकारी संपर्कात आहेत. तसेच इंफाळ, गुवाहाटी व दिल्ली येथे बैठकादेखील झाल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू