शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

सरकारच्या कृषी धोरणावर संघ असमाधानी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 07:00 IST

Rss Nagpur News केंद्राच्या कृषी धोरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील पूर्णत: समाधानी नसल्याचे चित्र आहे. सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणातदेखील यासंदर्भातील स्पष्ट संकेत दिसून आले.

ठळक मुद्देसरसंघचालकांच्या भाषणातून स्पष्ट संकेत किसान संघानेदेखील व्यक्त केली होती नाराजी

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या संसदेत कृषी सुधारणांसंदर्भातील विधेयके संमत झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया अद्यापही येत आहेत. केंद्राच्या कृषी धोरणांसंदर्भात अगोदर संघप्रणित भारतीय किसान संघाने नाराजी व्यक्त केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या कृषी धोरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील पूर्णत: समाधानी नसल्याचे चित्र आहे. सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणातदेखील यासंदर्भातील स्पष्ट संकेत दिसून आले.कृषी विधेयकांवरून विविध राज्यांत राजकारणदेखील तापले आहे. विजयादशमीच्या भाषणात केंद्र शासनाचे परराष्ट्र धोरण, कोरोनासंदभार्तील पुढाकार यांची सरसंघचालकांनी प्रशंसा केली. मात्र कृषी क्षेत्रात अद्याप काय करण्याची आवश्यकता आहे हे सांगत धोरणांमधील त्रुटीच समोर मांडल्या. कृषी धोरण हे शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनविणारे असले पाहिजे. अगदी बी-बियाणे, खतदेखील स्वत: बनविण्यासाठी तो स्वतंत्र असला पाहिजे. उत्पादनाची साठवणूक व प्रक्रिया करण्याची सुविधा जवळच उपलब्ध हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी धोरण हे कॉपोर्रेट क्षेत्र किंवा दलालांचे जाळे मोडणारे असले पाहिजे यावर डॉ. भागवत यांचा जोर होता. सोबतच पारंपरिक कृषीपद्धतीवर भर देत आधुनिकतेचा उपयोग झाला पाहिजे. कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेला या दिशेने नेणारे धोरण बनविणे आवश्यक आहे, असा त्यांच्या भाषणाचा सूर होता.भारतीय किसान संघानेदेखील केंद्र शासनाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. कोटा येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली व केंद्राने आणखी एक सुधारणा विधेयक संसदेत आणावे असा प्रस्ताव संमत झाला. त्यामुळे संघ परिवार आता कृषी धोरणावर पुढे काय भूमिका घेणार व केंद्र शासन खरोखर धोरणात बदलांसाठी काय पावले टाकणार याकडे शेतकऱ्यांचेदेखील लक्ष लागले आहे.शाश्वत शेतीसाठी धोरण हवेसरसंघचालकांचे भाषण हे एकाप्रकारे वर्तमान कृषी धोरणातील त्रुटींवर बोट ठेवणारे व लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या अपेक्षा व्यक्त करणारे होते. आपली पारंपरिक शेतीपद्धती ही शाश्वत आहे. या शेतीपद्धतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आणावे, अशी अपेक्षा असल्याचे मत भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :agricultureशेती