शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

सरकारच्या कृषी धोरणावर संघ असमाधानी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 07:00 IST

Rss Nagpur News केंद्राच्या कृषी धोरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील पूर्णत: समाधानी नसल्याचे चित्र आहे. सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणातदेखील यासंदर्भातील स्पष्ट संकेत दिसून आले.

ठळक मुद्देसरसंघचालकांच्या भाषणातून स्पष्ट संकेत किसान संघानेदेखील व्यक्त केली होती नाराजी

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या संसदेत कृषी सुधारणांसंदर्भातील विधेयके संमत झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया अद्यापही येत आहेत. केंद्राच्या कृषी धोरणांसंदर्भात अगोदर संघप्रणित भारतीय किसान संघाने नाराजी व्यक्त केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या कृषी धोरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील पूर्णत: समाधानी नसल्याचे चित्र आहे. सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणातदेखील यासंदर्भातील स्पष्ट संकेत दिसून आले.कृषी विधेयकांवरून विविध राज्यांत राजकारणदेखील तापले आहे. विजयादशमीच्या भाषणात केंद्र शासनाचे परराष्ट्र धोरण, कोरोनासंदभार्तील पुढाकार यांची सरसंघचालकांनी प्रशंसा केली. मात्र कृषी क्षेत्रात अद्याप काय करण्याची आवश्यकता आहे हे सांगत धोरणांमधील त्रुटीच समोर मांडल्या. कृषी धोरण हे शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनविणारे असले पाहिजे. अगदी बी-बियाणे, खतदेखील स्वत: बनविण्यासाठी तो स्वतंत्र असला पाहिजे. उत्पादनाची साठवणूक व प्रक्रिया करण्याची सुविधा जवळच उपलब्ध हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी धोरण हे कॉपोर्रेट क्षेत्र किंवा दलालांचे जाळे मोडणारे असले पाहिजे यावर डॉ. भागवत यांचा जोर होता. सोबतच पारंपरिक कृषीपद्धतीवर भर देत आधुनिकतेचा उपयोग झाला पाहिजे. कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेला या दिशेने नेणारे धोरण बनविणे आवश्यक आहे, असा त्यांच्या भाषणाचा सूर होता.भारतीय किसान संघानेदेखील केंद्र शासनाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. कोटा येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली व केंद्राने आणखी एक सुधारणा विधेयक संसदेत आणावे असा प्रस्ताव संमत झाला. त्यामुळे संघ परिवार आता कृषी धोरणावर पुढे काय भूमिका घेणार व केंद्र शासन खरोखर धोरणात बदलांसाठी काय पावले टाकणार याकडे शेतकऱ्यांचेदेखील लक्ष लागले आहे.शाश्वत शेतीसाठी धोरण हवेसरसंघचालकांचे भाषण हे एकाप्रकारे वर्तमान कृषी धोरणातील त्रुटींवर बोट ठेवणारे व लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या अपेक्षा व्यक्त करणारे होते. आपली पारंपरिक शेतीपद्धती ही शाश्वत आहे. या शेतीपद्धतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आणावे, अशी अपेक्षा असल्याचे मत भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :agricultureशेती