शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल अ‍ॅप’वरही संघ ‘दक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 11:04 IST

एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे.

ठळक मुद्दे‘सोशल मीडिया’वर समाजाला जोडणारवैचारिक संघर्षासाठी तथ्य मांडणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे. यातच आणखी एक पाऊल पुढे टाकत संघ परिवारातर्फे आता समाजापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’चा आधार घेण्यात येणार आहे. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून ‘सोशल मीडिया’वर होणाऱ्या विविध शाब्दिक हल्ल्यांसंदर्भात विविध संदर्भ सादर करत मुद्देसूद तथ्य मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१७ मध्ये संघातर्फे ‘सेवागाथा’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करण्यात आले होते. संघाच्या सेवाकार्यांबाबत यातून माहिती मांडण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून संघावर शाब्दिक हल्ले व आरोपांचे प्रमाण जास्त वाढले आहे. विशेषत: ‘सोशल मीडिया’वर तर संघावर टीकास्त्र सोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. संघाकडून साधारणत: प्रत्येक वेळी टीकांसंदर्भात बाजू मांडण्यात येत नाही. मात्र अशास्थितीत आम्ही ‘सोशल मीडिया’वर आपली बाजू कशी मांडायची, असा प्रश्न वारंवार संघ स्वयंसेवकांकडून उपस्थित करण्यात येत होता.हीच भावना लक्षात घेऊन संघ परिवारातील काही सदस्यांनी एकत्रित येऊन ‘ऋतम्’ हे ‘मोबाईल अ‍ॅप’ तयार केले आहे. यात थेट संघाच्या प्रचार-प्रसारावर भर देण्यात आलेला नाही, तर हे एकप्रकारचे ‘न्यूज अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप’ असून येथे मोठ्या प्रमाणात बौद्धिक सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच संघ विचारधारेशी जुळलेले विविध ‘मॅगझिन’, वर्तमानपत्रे तसेच लेखकांनादेखील याच्याशी जोडण्यात आले आहे. या माध्यमातून इतिहास, संस्कृती यांच्यासह वर्तमान स्थितीसंदर्भातील विविध साहित्य, व्हिडीओ समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे; सोबतच समाजातील सकारात्मक बाबीदेखील मांडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वैचारिक मंथनासाठी उचलले पाऊलसंघाबाबतच्या अनेक ‘पोस्ट’ किंवा वृत्त विपर्यास करून मांडण्यात येतात. त्यामुळे नेमके तथ्य व माहिती वैचारिक व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे समाजातदेखील तथ्य हवे तसे पोहोचू शकत नाही. त्यामुळेच विविध माध्यमांवर लिहिणाºयांना, वैचारिक भूमिका मांडणाऱ्यांना एक मंच प्रदान करण्याचे हे माध्यम आहे. त्यांच्या विचारांनादेखील यात स्थान देण्यात येईल. विशेषत: म्हणजे आजच्या वैचारिक लढाईच्या मंथनात विचारांची स्पष्टता यावी यादृष्टीने हे ‘अ‍ॅप’ तयार करण्यात आले असल्याची माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणारया ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संघ परिवारातील विविध संघटनांचा मानस आहे. यासाठी देशभरात १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘सोशल मीडिया’वर एक मोहिमदेखील चालविण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून संघ विचार पोहोचावे यासाठी देशातील विविध भाषांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृतसह उर्दू भाषिकांचादेखील यात विचार करण्यात आला आहे. तीन महिन्यांत एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ