शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका : दिलीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 21:45 IST

लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक चर्चा करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.जगताप यांनी सांगितले की, भाजप-सेनेला रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व इतर समविचारी पक्षांनी एकही लोकसभेची जागा न लढता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मात्र आघाडी रिपब्लिकन नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे समविचारी मते आघाडीला मिळू शकली नाही. तेव्हा लोकसभेत झालेली चूक येत्या विधानसभेत तरी करू नका, विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक चर्चा करा, अन्यथा रिपब्लिकन आघाडीची व्याप्ती वाढवून विधानसभेत स्वतंत्रपणे १०० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रपरिषदेत रिपाइंचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे, दिनेश गोडघाटे, खोरिपचे अमृत गजभिये, अशोक भिवगडे, उमेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणMediaमाध्यमे