शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका : दिलीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 21:45 IST

लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक चर्चा करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.जगताप यांनी सांगितले की, भाजप-सेनेला रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व इतर समविचारी पक्षांनी एकही लोकसभेची जागा न लढता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मात्र आघाडी रिपब्लिकन नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे समविचारी मते आघाडीला मिळू शकली नाही. तेव्हा लोकसभेत झालेली चूक येत्या विधानसभेत तरी करू नका, विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक चर्चा करा, अन्यथा रिपब्लिकन आघाडीची व्याप्ती वाढवून विधानसभेत स्वतंत्रपणे १०० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रपरिषदेत रिपाइंचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे, दिनेश गोडघाटे, खोरिपचे अमृत गजभिये, अशोक भिवगडे, उमेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणMediaमाध्यमे