शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला करायचेय ‘रोल मॉडेल’

By admin | Updated: September 15, 2015 05:57 IST

हे स्पर्धेचे युग आहे. राज्याराज्यांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. नागपूर शहर विकासात पुढे चालले आहे. या शहराची

नागपूर : हे स्पर्धेचे युग आहे. राज्याराज्यांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. नागपूर शहर विकासात पुढे चालले आहे. या शहराची ओळख ‘आॅरेंज सिटी’, ‘ग्रीन सिटी’ व ‘झिरो माईल’ अशी आहे. आता देशातील शैक्षणिक ‘हब’ व उद्योगांचे शहर अशी नवीन ओळख प्रस्थापित करायची आहे. हे शहर देशासाठी ‘रोल मॉडेल’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर महापालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकापूर येथील क्रीडा संकुलात पार पडला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरात केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. देशभरातील विविध राज्यांतून येथे लोक नोकरीला येतात. मात्र, शहरातील आपुलकी, एकमेकांना जपण्याचा स्वभाव यामुळे त्या लोकांनाही हे शहर आपलेसे वाटू लागते व निवृत्तीनंतरही ते येथेच स्थायिक होतात. येथे प्रत्येक जातीधर्माचे लोक आनंदाने राहतात. त्यामुळे नागपूरला लहान भारताचा चेहरा प्राप्त झाला आहे. शहर विकासाच्या वाटेवर असताना नगर प्रशासनासोबतच नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी यात साथ दिली तर विकासाची गाडी पुढे नेण्यास मदत होईल. महापालिकेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. शहराच्या विकासात राज्य सरकार महापालिकेच्या सोबत असेल, असा विश्वास देत महापालिकेने पाठविलेल्या विकासाच्या सर्व प्रस्तावांमध्ये राज्य सरकार आपला वाटा देईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले. महापौर प्रवीण दटके म्हणाले, १५० वर्षांत नागपूरचा विविध क्षेत्रात विकास झाला. यात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक अशा सर्र्वांचाच सहभाग आहे, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी केले. नागपूर महापालिकेचा इतिहास गौरवशाली आहे. १८६४ साली महापालिकेची स्थापना झाली. ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यावेळी नागपूर शहराचे क्षेत्र १५.५ चौ.कि.मी. होते तर लोकसंख्या ८२ हजार होती. केरोसीनचे पथदिवे होते. आता महापालिकेला १५० वर्षे पूर्र्ण झाली आहेत. आज शहराचे क्षेत्रफळ २२७.२९ चौ.कि.मी. झाले असून, लोकसंख्या २४ लाखांंवर गेली आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, कचऱ्याचे नियोजन, झोपडपट्टी विकास, शहरातील रस्ते, उड्डाणपुलाची निर्मिती यासोबतच प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. महापालिकेने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प, ग्रीन बस, स्वच्छता अभियान यासोबतच शहर विकासाचे प्रकल्प हाती घेतले आहे. केंद्र सरकारने नागपूर शहराची ‘स्मार्ट सिटी’साठी निवड केली आहे. शहराच्या विकासात लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही योगदान असल्याचे दटके म्हणाले. (प्रतिनिधी)नागपूर महोत्सवात राज्य सरकार सहभागी होणारमहापालिकेतर्फे दरवर्षी नागपूर महोत्सव आयोजित केला जातो. महापालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यावर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवात राज्य सरकारही सहभागी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले जाईल व यामुळे देशालाच नव्हे तर जगाला नागपूर इतिहास माहीत होईल, असेही फडणवीस म्हणाले. नागपूरच्या विकासात महापालिकेचे योगदान - गडकरी नितीन गडकरी म्हणाले, नागपूर हे देशाचे हृदय असून, देश व राज्याला अनेक चांगले राजकीय नेते शहराने दिले आहेत. नागपूरचे पहिले महापौर बॅ. शेषराव वानखेडे हे राज्य मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. महापौर राहिलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. नागपूर शहराच्या विकासात महापालिकेचे मोठे योगदान आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना राबविणारे हे देशातील पहिले शहर असून, देश-विदेशातदेखील या प्रणालीचे सादरीकरण झाले आहे. आता शहरात पाण्यासाठी एकही मोर्चा निघत नाही. महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी राज्य सरकारला विकते आहे. यापासून १८ कोटी रुपयांची रॉयल्टी महापालिकेला मिळत आहे. सांडपाण्यापासून निघणाऱ्या सीएनजीवर शहर बस चालविण्याचा संकल्प आहे. येथे इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली बस सुरू झाली आहे. गोंडराजे, राजे भोसले अशी ऐतिहासिक परंपरा या शहराला लाभली आहे. हे शहर जसे स्वच्छ शहर म्हणून पुढे येईल तसेच ते इतिहास, वारसा व संस्कृतीचे शहर म्हणूनही नावारूपास येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. क्षणचित्रेउपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत के ले. राष्ट्रपतींचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर वायुसेनेच्या बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचा समारोपही राष्ट्रगीताने करण्यात आला.महापालिकेच्या प्रथेनुसार महापौर प्रवीण दटके यांनी तुळशीचे रोप देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्वागत केले, तसेच राष्ट्रपतींना मानपत्र भेट दिले.मानपत्राचे वाचन महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी केले. उपमहापौर गणेश पोकुलवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत महापालिकेचे विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केले. महापालिकेच्या १५१ वर्षे पूर्णत्व सोहळ्यानिमित्ताने पन्नालाल देवडिया विद्यालयाचे विद्यार्थी लाल रंगाचा गणवेश परिधान करून स्टेडियमच्या पायऱ्यांवर १५१ च्या आकारात बसले होते. महापालिकेचा शिक्षण विभाग व मैत्री परिवार यांनी यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या विकास योजना तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. सोहळ्याला उपस्थित निमंत्रित. नगरसेवक व पदाधिकारी आणि विशेष निमंत्रितांचे महापालिकेच्यावतीने दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होणार असल्याने मनपाचे अधिकारी ड्रेसकोडमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रितांच्या दुचाकी वाहनांची पार्किंग सुविधा संकुलापासून लांब अंतरावर करण्यात आली होती. येथे जाणारा रस्ताही चांगला नसल्याने त्यांची गैरसोय झाली. राष्ट्रपतींच्या ताफ्यात ५० गाड्यांचा समावेश होता. त्यांच्या आगमनाच्या ३० मिनिटापूर्वी प्रवेश बंद करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संकुलातून बाहेर पडल्यानंतर १० मिनिटांनी गेट उघडण्यात आले. त्यानंतर निमंत्रित बाहेर पडले.राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. पासधारकांनाच संकुलात प्रवेश होता. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.