शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, गडरलाइनमुळे चांदमारीवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक ...

नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी

नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील चांदमारी नगरातील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील नागरिक पाणी, गडरलाइन, रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नळलाइन नसल्यामुळे नागरिक त्रस्त

चांदमारीनगरात नळलाइन नाही. या भागात महापालिकेने नळलाइन टाकली. परंतु नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या भरवशावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरही नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

रस्त्यांची अवस्था बिकट

चांदमारीच्या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. चांदमारीनगरातील अंतर्गत रस्तेही मातीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचलेले असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचतो. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविण्यात अडचणी येतात. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे या भागात डांबरीकरण करण्याची मागणी आहे.

सफाईचा अभाव

सफाई कर्मचारीच येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे या भागात जागोजागी कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे या भागात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय परिसरात रिकामे प्लॉट आहेत. या प्लॉटवर कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येते. महापालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

रस्त्याचे डांबरीकरण करावे

‘चांदमारीनगरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होते. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे.’

-शेख कदीर, नागरिक

नळ कनेक्शन द्यावे

‘नळलाइन टाकण्यात आलेली असून, नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. महापालिकेने नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’

-वनिता करंडे, नागरिक

सफाई कर्मचारी पाठवावेत

‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची मागणी आहे.’

-प्राजक्ता बिरुले, नागरिक

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी

‘रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी.’

‘मोहन काटेकर, नागरिक

रस्त्यांचे डांबरीकरण करावे

‘मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून चालण्याची पाळी येते. त्यामुळे महापालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची गरज आहे.’

-जयंती सोनवाणी, नागरिक

नियमित सफाई व्हावी

‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी पाठवून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-हिरा माटे, नागरिक

रिकाम्या प्लॉटमध्ये साचतो कचरा

‘रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

-मंजू सोळंकी, नागरिक

..................