शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्ते, गडरलाइनमुळे चांदमारीवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक ...

नळलाइन नाही : रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी

नागपूर : नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत आहे. शहरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील चांदमारी नगरातील नागरिकांना मात्र मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील नागरिक पाणी, गडरलाइन, रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नळलाइन नसल्यामुळे नागरिक त्रस्त

चांदमारीनगरात नळलाइन नाही. या भागात महापालिकेने नळलाइन टाकली. परंतु नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या भरवशावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरही नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना नळ कनेक्शन देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

रस्त्यांची अवस्था बिकट

चांदमारीच्या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. चांदमारीनगरातील अंतर्गत रस्तेही मातीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचलेले असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचतो. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविण्यात अडचणी येतात. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे या भागात डांबरीकरण करण्याची मागणी आहे.

सफाईचा अभाव

सफाई कर्मचारीच येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे या भागात जागोजागी कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे या भागात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय परिसरात रिकामे प्लॉट आहेत. या प्लॉटवर कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येते. महापालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

रस्त्याचे डांबरीकरण करावे

‘चांदमारीनगरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होते. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे.’

-शेख कदीर, नागरिक

नळ कनेक्शन द्यावे

‘नळलाइन टाकण्यात आलेली असून, नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. महापालिकेने नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’

-वनिता करंडे, नागरिक

सफाई कर्मचारी पाठवावेत

‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची मागणी आहे.’

-प्राजक्ता बिरुले, नागरिक

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी

‘रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी.’

‘मोहन काटेकर, नागरिक

रस्त्यांचे डांबरीकरण करावे

‘मातीचे रस्ते असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते. पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून चालण्याची पाळी येते. त्यामुळे महापालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची गरज आहे.’

-जयंती सोनवाणी, नागरिक

नियमित सफाई व्हावी

‘सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचलेला असतो. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी पाठवून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-हिरा माटे, नागरिक

रिकाम्या प्लॉटमध्ये साचतो कचरा

‘रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

-मंजू सोळंकी, नागरिक

..................