शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

दोन वर्षापासून प्रभागातील रस्त्यांची कामे ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३० मधील अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा यासह अन्य वस्त्यातील रस्त्यांची कामे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांवरील गिट्टी बाहेर निघाली असून खड्डे पडले आहेत. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता, प्रभागातील रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली. काही कामांचे कार्यादेशही झाले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करीत, कार्यादेश झालेली कामे थांबविली. आता पावसाळा सुरू होताच खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सांगितले.

नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करता यावीत, यासाठी अर्थसंकल्पात वर्षाला २० लाखांच्या निधीची तरतूद केली जाते. तरतुदीनुसार फाईल तयार केल्या आहेत. परंतु निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने दोन वर्षात वॉर्ड निधीतील विकास कामे झालेली नाही. अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा परिसरातील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडल्याने वाहनामुळे धूळ उडत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्तेही नादुरुस्त आहेत. यामुळे लहान मुलांना सायकल चालविताना वा खेळताना गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

विहिरींचे पाणी दूषित

ताजबाग, जुना सुभेदार, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा आदी भागातील गडरलाईन जुन्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी लिकेज असल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते. यामुळे घराघरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा वापर करता येत नाही. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. वास्तविक विहिरीच्या पाण्याचा वापर केल्यास मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

....

जागोजागी चेंबर नादुरुस्त

गडरलाईनवरील चेंबर ठिकठिकाणी नादुरुस्त झाले आहेत. जोराचा पाऊस आला की गडरलाईनमधील घाण पाणी तुटलेल्या चेंबरमधून रस्त्यावर वाहते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.