शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षापासून प्रभागातील रस्त्यांची कामे ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३० मधील अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा यासह अन्य वस्त्यातील रस्त्यांची कामे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांवरील गिट्टी बाहेर निघाली असून खड्डे पडले आहेत. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता, प्रभागातील रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली. काही कामांचे कार्यादेशही झाले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करीत, कार्यादेश झालेली कामे थांबविली. आता पावसाळा सुरू होताच खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सांगितले.

नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करता यावीत, यासाठी अर्थसंकल्पात वर्षाला २० लाखांच्या निधीची तरतूद केली जाते. तरतुदीनुसार फाईल तयार केल्या आहेत. परंतु निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने दोन वर्षात वॉर्ड निधीतील विकास कामे झालेली नाही. अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा परिसरातील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडल्याने वाहनामुळे धूळ उडत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्तेही नादुरुस्त आहेत. यामुळे लहान मुलांना सायकल चालविताना वा खेळताना गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

विहिरींचे पाणी दूषित

ताजबाग, जुना सुभेदार, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा आदी भागातील गडरलाईन जुन्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी लिकेज असल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते. यामुळे घराघरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा वापर करता येत नाही. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. वास्तविक विहिरीच्या पाण्याचा वापर केल्यास मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

....

जागोजागी चेंबर नादुरुस्त

गडरलाईनवरील चेंबर ठिकठिकाणी नादुरुस्त झाले आहेत. जोराचा पाऊस आला की गडरलाईनमधील घाण पाणी तुटलेल्या चेंबरमधून रस्त्यावर वाहते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.