शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दोन वर्षापासून प्रभागातील रस्त्यांची कामे ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३० मधील अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा यासह अन्य वस्त्यातील रस्त्यांची कामे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांवरील गिट्टी बाहेर निघाली असून खड्डे पडले आहेत. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता, प्रभागातील रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली. काही कामांचे कार्यादेशही झाले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करीत, कार्यादेश झालेली कामे थांबविली. आता पावसाळा सुरू होताच खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सांगितले.

नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करता यावीत, यासाठी अर्थसंकल्पात वर्षाला २० लाखांच्या निधीची तरतूद केली जाते. तरतुदीनुसार फाईल तयार केल्या आहेत. परंतु निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने दोन वर्षात वॉर्ड निधीतील विकास कामे झालेली नाही. अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा परिसरातील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडल्याने वाहनामुळे धूळ उडत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्तेही नादुरुस्त आहेत. यामुळे लहान मुलांना सायकल चालविताना वा खेळताना गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

विहिरींचे पाणी दूषित

ताजबाग, जुना सुभेदार, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा आदी भागातील गडरलाईन जुन्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी लिकेज असल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते. यामुळे घराघरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा वापर करता येत नाही. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. वास्तविक विहिरीच्या पाण्याचा वापर केल्यास मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

....

जागोजागी चेंबर नादुरुस्त

गडरलाईनवरील चेंबर ठिकठिकाणी नादुरुस्त झाले आहेत. जोराचा पाऊस आला की गडरलाईनमधील घाण पाणी तुटलेल्या चेंबरमधून रस्त्यावर वाहते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.