शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

वर्धा मार्गावर मेट्रोमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: October 30, 2016 02:46 IST

वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून

नागरिक त्रस्त : अधिकारी झोपेत, रोजच उद््भवते स्थितीनागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून यावर तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्री नागपूर विमानतळासमोर वर्धा मार्गावर जवळपास अडीच तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे शेकडो वाहने गर्दीत अडकली. सोबतच दोन अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत फसल्या. गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)वाहनचालक निरुत्तररात्री कोंडीत फसलेले लोक त्रस्त होते. कोंडी का झाली आणि केव्हा दूर होईल, यावर लोक निरुत्तर होते. सदर प्रतिनिधी कोंडीत फसला होता. लोकांनी सांगितले की, गेल्या ३५ मिनिटांपासून वाहने जागीच उभी आहेत. काही मिनिटानंतर विचारपूस केली असता चिंचभुवनकडून येणाऱ्या मार्गावर एका बाजूला मोठी ट्रॉली फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून त्यामुळे चिंचभुवनकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही वेळानंतर कोंडीत फसलेल्या काही युवकांनी साईट अधिकारी वा अभियंता कुठे आहे, अशी विचारपूस केली. बराच वेळ शोध न लागल्याने युवकांनी स्वत: शोधमोहीम सुरू केली. कोंडी सोडवून अन्य मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतरही अधिकारी वा अभियंता सापडला नाही. अधिकारी झोपले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सदर प्रतिनिधीने साईट अभियंत्याचा मोबाईल क्रमांक विचारला, पण कुणीही दिला नाही. क्रमांक माहीत नसल्याचे सर्वांनी उत्तर दिले. वाहतुकीची कोंडी झाल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी नव्हती. प्रतिनिधीने अधिकाऱ्याला मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्याचा मोबाईल बंद होता. त्या अधिकाऱ्याला एसएमएससुद्धा केला, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या अधिकाऱ्याकडून कुठलाही मॅसेज आला नाही वा कोंडी का झाली, याची माहिती मेट्रो रेल्वेतर्फे देण्यात आली नाही. वर्धा मार्गावर होणारी कोंडी नेहमीचवर्धा मार्गावर दररोजच वाहतुकीची कोंडी होते. मेट्रो रेल्वे कामावरील मोठ्या मशीन्स मार्गाच्या मध्यभागी उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतूक जाम होते. अशा स्थितीत वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात केले पाहिजे. कोंडी कुठपर्यंत झाली आहे आणि ती कशी सोडविता येईल, यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी असली पाहिजे. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. रात्री मेट्रो रेल्वे अधिकारी या ठिकाणी तैनात असला पाहिजे. पण याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले. त्रासाबद्दल खेदयासंदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे उपमहाव्यवस्थापक (समन्वय व जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागपूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.