शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मार्गावर मेट्रोमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: October 30, 2016 02:46 IST

वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून

नागरिक त्रस्त : अधिकारी झोपेत, रोजच उद््भवते स्थितीनागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून यावर तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्री नागपूर विमानतळासमोर वर्धा मार्गावर जवळपास अडीच तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे शेकडो वाहने गर्दीत अडकली. सोबतच दोन अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत फसल्या. गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)वाहनचालक निरुत्तररात्री कोंडीत फसलेले लोक त्रस्त होते. कोंडी का झाली आणि केव्हा दूर होईल, यावर लोक निरुत्तर होते. सदर प्रतिनिधी कोंडीत फसला होता. लोकांनी सांगितले की, गेल्या ३५ मिनिटांपासून वाहने जागीच उभी आहेत. काही मिनिटानंतर विचारपूस केली असता चिंचभुवनकडून येणाऱ्या मार्गावर एका बाजूला मोठी ट्रॉली फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून त्यामुळे चिंचभुवनकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही वेळानंतर कोंडीत फसलेल्या काही युवकांनी साईट अधिकारी वा अभियंता कुठे आहे, अशी विचारपूस केली. बराच वेळ शोध न लागल्याने युवकांनी स्वत: शोधमोहीम सुरू केली. कोंडी सोडवून अन्य मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतरही अधिकारी वा अभियंता सापडला नाही. अधिकारी झोपले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सदर प्रतिनिधीने साईट अभियंत्याचा मोबाईल क्रमांक विचारला, पण कुणीही दिला नाही. क्रमांक माहीत नसल्याचे सर्वांनी उत्तर दिले. वाहतुकीची कोंडी झाल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी नव्हती. प्रतिनिधीने अधिकाऱ्याला मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्याचा मोबाईल बंद होता. त्या अधिकाऱ्याला एसएमएससुद्धा केला, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या अधिकाऱ्याकडून कुठलाही मॅसेज आला नाही वा कोंडी का झाली, याची माहिती मेट्रो रेल्वेतर्फे देण्यात आली नाही. वर्धा मार्गावर होणारी कोंडी नेहमीचवर्धा मार्गावर दररोजच वाहतुकीची कोंडी होते. मेट्रो रेल्वे कामावरील मोठ्या मशीन्स मार्गाच्या मध्यभागी उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतूक जाम होते. अशा स्थितीत वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात केले पाहिजे. कोंडी कुठपर्यंत झाली आहे आणि ती कशी सोडविता येईल, यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी असली पाहिजे. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. रात्री मेट्रो रेल्वे अधिकारी या ठिकाणी तैनात असला पाहिजे. पण याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले. त्रासाबद्दल खेदयासंदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे उपमहाव्यवस्थापक (समन्वय व जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागपूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.