शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वर्धा मार्गावर मेट्रोमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: October 30, 2016 02:46 IST

वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून

नागरिक त्रस्त : अधिकारी झोपेत, रोजच उद््भवते स्थितीनागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून यावर तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्री नागपूर विमानतळासमोर वर्धा मार्गावर जवळपास अडीच तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे शेकडो वाहने गर्दीत अडकली. सोबतच दोन अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत फसल्या. गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)वाहनचालक निरुत्तररात्री कोंडीत फसलेले लोक त्रस्त होते. कोंडी का झाली आणि केव्हा दूर होईल, यावर लोक निरुत्तर होते. सदर प्रतिनिधी कोंडीत फसला होता. लोकांनी सांगितले की, गेल्या ३५ मिनिटांपासून वाहने जागीच उभी आहेत. काही मिनिटानंतर विचारपूस केली असता चिंचभुवनकडून येणाऱ्या मार्गावर एका बाजूला मोठी ट्रॉली फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून त्यामुळे चिंचभुवनकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही वेळानंतर कोंडीत फसलेल्या काही युवकांनी साईट अधिकारी वा अभियंता कुठे आहे, अशी विचारपूस केली. बराच वेळ शोध न लागल्याने युवकांनी स्वत: शोधमोहीम सुरू केली. कोंडी सोडवून अन्य मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतरही अधिकारी वा अभियंता सापडला नाही. अधिकारी झोपले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सदर प्रतिनिधीने साईट अभियंत्याचा मोबाईल क्रमांक विचारला, पण कुणीही दिला नाही. क्रमांक माहीत नसल्याचे सर्वांनी उत्तर दिले. वाहतुकीची कोंडी झाल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी नव्हती. प्रतिनिधीने अधिकाऱ्याला मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्याचा मोबाईल बंद होता. त्या अधिकाऱ्याला एसएमएससुद्धा केला, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या अधिकाऱ्याकडून कुठलाही मॅसेज आला नाही वा कोंडी का झाली, याची माहिती मेट्रो रेल्वेतर्फे देण्यात आली नाही. वर्धा मार्गावर होणारी कोंडी नेहमीचवर्धा मार्गावर दररोजच वाहतुकीची कोंडी होते. मेट्रो रेल्वे कामावरील मोठ्या मशीन्स मार्गाच्या मध्यभागी उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतूक जाम होते. अशा स्थितीत वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात केले पाहिजे. कोंडी कुठपर्यंत झाली आहे आणि ती कशी सोडविता येईल, यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी असली पाहिजे. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. रात्री मेट्रो रेल्वे अधिकारी या ठिकाणी तैनात असला पाहिजे. पण याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले. त्रासाबद्दल खेदयासंदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे उपमहाव्यवस्थापक (समन्वय व जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागपूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.