शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

समूहातील प्रजननामुळे वाघांची नवी पिढी कमकुवत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र असे असले तरी एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच आनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय व इतर देशातील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉलुशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत हा शोधप्रबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष मांडला आहे. प्रकाशित झालेल्या या शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला आहे. पाटील यांच्या मते केवळ वाघ नाही तर इतरही वन्यप्राण्यांचे संचारमार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली म्हणजे दुपटीने वाढली आहे. मात्र याच काळात वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली आहे. माणसांचा जंगलात हस्तक्षेप वाढला असून, मानव-वन्यजीव संघर्ष रुद्र रूप धारण करीत आहे. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढले गेले, विकासकामे वाढली. मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत. एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने वाघांचे वास्तव्य एकाच अधिवासात मर्यादित हाेत आहे. त्यामुळे त्याच अधिवासात राहणाऱ्या आपल्याच कुळातील वाघ-वाघिणीशी ब्रिडिंग हाेण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपुष्टात येण्याचा धाेका वाढला आहे.

बेंगाल टायगरचे उदाहरण

संशाेधनात बेंगाल टायगरचा आवर्जून उल्लेख केला आहे. बेंगाल टायगर हा वेगवेगळ्या कुळातील वाघांच्या प्रजननातून जन्माला आलेले अतिशय देखणी आणि मजबूत ब्रिड आहे. त्याच्यात सर्वाधिक प्रमाणात आनुवंंशिक वैविध्य आहेत. अभ्यासानुसार पिंजऱ्यात किंवा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या वाघांच्या नर-मादीचे प्रजनन झाले, तर जन्माला येणारे पिल्ले कमकुवत हाेतात. सिंहाच्या बाबतीतही हे अवलाेकन अभ्यासले गेल्याचे यादव पाटील यांनी सांगितले.

काय हाेतात दुष्परिणाम

- आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.

- जनुकीय आनुवंशिक वैविध्य नाहीसे हाेणे.

- कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.

- कालांतराने सध्या अस्तित्वात असलेली प्रजाती नाहीशी हाेण्याचीही शक्यता.

माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता. काेणतेही आजाराचे बळी पडण्याची शक्यता आहे. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, जन्मत:च मृत्यूचा धाेका. पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता. जन्मत: पांढरेपणा येण्याची शक्यता असते.

- डाॅ. हेमंत जैन, वेटनरी सर्जन

वाघांचे अस्तित्व व्याघ्र प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या प्रजननासाठी संचार मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या राज्यात संचार मार्गांची दुरवस्था आहे. भविष्यात हा वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांनी नवीन अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करून सुरवात केली आहे. मात्र व्यवस्थापन गंभीर्याने होणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प

भारतात ५०

राज्यात ५० अभयारण्ये

भारतात अंदाजे ७००

वाघांची संख्या राज्यात ३१६

भारतात २९९५