शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

समूहातील प्रजननामुळे वाघांची नवी पिढी कमकुवत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र असे असले तरी एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच आनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय व इतर देशातील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉलुशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत हा शोधप्रबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष मांडला आहे. प्रकाशित झालेल्या या शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला आहे. पाटील यांच्या मते केवळ वाघ नाही तर इतरही वन्यप्राण्यांचे संचारमार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली म्हणजे दुपटीने वाढली आहे. मात्र याच काळात वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली आहे. माणसांचा जंगलात हस्तक्षेप वाढला असून, मानव-वन्यजीव संघर्ष रुद्र रूप धारण करीत आहे. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढले गेले, विकासकामे वाढली. मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत. एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने वाघांचे वास्तव्य एकाच अधिवासात मर्यादित हाेत आहे. त्यामुळे त्याच अधिवासात राहणाऱ्या आपल्याच कुळातील वाघ-वाघिणीशी ब्रिडिंग हाेण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपुष्टात येण्याचा धाेका वाढला आहे.

बेंगाल टायगरचे उदाहरण

संशाेधनात बेंगाल टायगरचा आवर्जून उल्लेख केला आहे. बेंगाल टायगर हा वेगवेगळ्या कुळातील वाघांच्या प्रजननातून जन्माला आलेले अतिशय देखणी आणि मजबूत ब्रिड आहे. त्याच्यात सर्वाधिक प्रमाणात आनुवंंशिक वैविध्य आहेत. अभ्यासानुसार पिंजऱ्यात किंवा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या वाघांच्या नर-मादीचे प्रजनन झाले, तर जन्माला येणारे पिल्ले कमकुवत हाेतात. सिंहाच्या बाबतीतही हे अवलाेकन अभ्यासले गेल्याचे यादव पाटील यांनी सांगितले.

काय हाेतात दुष्परिणाम

- आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.

- जनुकीय आनुवंशिक वैविध्य नाहीसे हाेणे.

- कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.

- कालांतराने सध्या अस्तित्वात असलेली प्रजाती नाहीशी हाेण्याचीही शक्यता.

माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता. काेणतेही आजाराचे बळी पडण्याची शक्यता आहे. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, जन्मत:च मृत्यूचा धाेका. पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता. जन्मत: पांढरेपणा येण्याची शक्यता असते.

- डाॅ. हेमंत जैन, वेटनरी सर्जन

वाघांचे अस्तित्व व्याघ्र प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या प्रजननासाठी संचार मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या राज्यात संचार मार्गांची दुरवस्था आहे. भविष्यात हा वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांनी नवीन अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करून सुरवात केली आहे. मात्र व्यवस्थापन गंभीर्याने होणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प

भारतात ५०

राज्यात ५० अभयारण्ये

भारतात अंदाजे ७००

वाघांची संख्या राज्यात ३१६

भारतात २९९५