शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

समूहातील प्रजननामुळे वाघांची नवी पिढी कमकुवत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र असे असले तरी एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच आनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय व इतर देशातील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉलुशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत हा शोधप्रबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष मांडला आहे. प्रकाशित झालेल्या या शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला आहे. पाटील यांच्या मते केवळ वाघ नाही तर इतरही वन्यप्राण्यांचे संचारमार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली म्हणजे दुपटीने वाढली आहे. मात्र याच काळात वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली आहे. माणसांचा जंगलात हस्तक्षेप वाढला असून, मानव-वन्यजीव संघर्ष रुद्र रूप धारण करीत आहे. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढले गेले, विकासकामे वाढली. मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत. एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने वाघांचे वास्तव्य एकाच अधिवासात मर्यादित हाेत आहे. त्यामुळे त्याच अधिवासात राहणाऱ्या आपल्याच कुळातील वाघ-वाघिणीशी ब्रिडिंग हाेण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपुष्टात येण्याचा धाेका वाढला आहे.

बेंगाल टायगरचे उदाहरण

संशाेधनात बेंगाल टायगरचा आवर्जून उल्लेख केला आहे. बेंगाल टायगर हा वेगवेगळ्या कुळातील वाघांच्या प्रजननातून जन्माला आलेले अतिशय देखणी आणि मजबूत ब्रिड आहे. त्याच्यात सर्वाधिक प्रमाणात आनुवंंशिक वैविध्य आहेत. अभ्यासानुसार पिंजऱ्यात किंवा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या वाघांच्या नर-मादीचे प्रजनन झाले, तर जन्माला येणारे पिल्ले कमकुवत हाेतात. सिंहाच्या बाबतीतही हे अवलाेकन अभ्यासले गेल्याचे यादव पाटील यांनी सांगितले.

काय हाेतात दुष्परिणाम

- आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.

- जनुकीय आनुवंशिक वैविध्य नाहीसे हाेणे.

- कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.

- कालांतराने सध्या अस्तित्वात असलेली प्रजाती नाहीशी हाेण्याचीही शक्यता.

माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता. काेणतेही आजाराचे बळी पडण्याची शक्यता आहे. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, जन्मत:च मृत्यूचा धाेका. पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता. जन्मत: पांढरेपणा येण्याची शक्यता असते.

- डाॅ. हेमंत जैन, वेटनरी सर्जन

वाघांचे अस्तित्व व्याघ्र प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या प्रजननासाठी संचार मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या राज्यात संचार मार्गांची दुरवस्था आहे. भविष्यात हा वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांनी नवीन अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करून सुरवात केली आहे. मात्र व्यवस्थापन गंभीर्याने होणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प

भारतात ५०

राज्यात ५० अभयारण्ये

भारतात अंदाजे ७००

वाघांची संख्या राज्यात ३१६

भारतात २९९५