शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

उपराजधानीला जलप्रदूषणाचा धोका

By admin | Updated: June 5, 2016 02:56 IST

उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून,

पर्यावरण जीवनाचा आधार : तलावांचे आरोग्य बिघडले नागपूर : उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ‘जल’ हा सुद्धा पर्यावरणाचा प्रमुख घटक आहे. नागपूरपासुन काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी आहे, शिवाय पश्चिमेला वर्धा आणि पूर्वेला वैनगंगा आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच या प्रमुख नद्यांमधील जलप्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने जलप्रदूषण रोखण्याचा संकल्प घेतला पाहिजे. पर्यावरण संरक्षणाचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे. पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते. सध्या देशातील बहुतांश मोठी शहरे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. मात्र त्याचवेळी उपराजधानी वनराईच्या कुशीत आजही सुरक्षित आहे. नागपुरातील वायू प्रदूषणाने अद्यापही धोक्याची सीमा ओलांडलेली नाही. ही नागपूरकरांसाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. परंतु मागील दशकभरापासून नागपुरातही झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. शिवाय शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल झाली आहे. त्याचा पर्यावरणावर थेट परिणाम होऊ लागला आहे. सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.(प्रतिनिधी)झाडे तोडू नका! विकासाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे; मात्र हे चुकीचे आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. कधी काळी नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर होते. परंतु आज शहर केवळ नावापुरते हिरवेगार राहिले आहे. मागील काही वर्षांत हजारो झाडांची कत्तल झाली आहे. याचा पर्यावरणावर थेट परिणाम होत आहे. तरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूरकरांनी वृक्षतोड न करण्याची शपथ घेण्याची गरज आहे. शहरात कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भविष्यातील हा धोका टाळण्याची आम्ही वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड केली पाहिजे. त्याचवेळी शहरातील जलस्रोतांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घ्यावा. - डॉ. कविता रतन, पर्यावरण तज्ज्ञ.वायू प्रदूषण वाढते! उपराजधानीत वायू प्रदूषण वाढत आहे. मात्र देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत आजही नागपूर सुरक्षित आहे. नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे. त्याचा शहराला प्रचंड फायदा होत आहे. दुसरीकडे आजही शहरातील वाहनांची संख्या आटोक्यात आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता शहराच्या तुलनेत नागपुरात वाहनांची संख्या फारच कमी आहे. शिवाय उपराजधानीच्या सभोवताल कारखानेसुद्धा कमी आहेत. सर्वाधिक प्रदूषण वाहने व कारखान्यांमुळे होते. मात्र असे असले तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी नागपूरकरांनी आतापासूनच प्रदूषणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जलप्रदूषणाबाबतसुद्धा नागपूर सुरक्षित आहे. उपराजधानीला प्रामुख्याने पेंच प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, शिवाय हा प्रकल्प जंगलात असून पूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. -पवन लाभसेटवार,पर्यावरण तज्ज्ञ