शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

नागपूर विभागात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 11:04 IST

२०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून, खरीप हंगाम २०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा ही कीड शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते, असे विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी म्हटले आहे.गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून, कापूस उत्पादनातील सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे (मार्केट यार्ड), गोडाऊन, जिनिंग, प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर, रोटावेटर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल.पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. कपाशीचा हंगाम संपण्याच्या वेळी शेतातील कीड रोगग्रस्त पाने, पाते, फुले, बोंडामध्ये असलेल्या बोंडअळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत.पऱ्हाटी काढल्यानंतर शक्यतो दिवसाच नांगरणी करण्याचा सल्लाकपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीची सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करून बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पऱ्हाटी शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा, इंधन ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरणी हिवाळ्यातच करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. शक्यतो दिवसा नांगरणी केल्यास किडीचे नैसर्गिक शत्रू चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते.

टॅग्स :cottonकापूस