शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रि ंग रोड बनला ‘अ‍ॅक्सिडेंट स्पॉट’

By admin | Updated: February 27, 2015 02:17 IST

यशोधरानगर येथील रिंग रोडवरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरू असते. मुख्यत: कामठी रोडकडून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मुख्य रिंग रोडवर वाहतुकीची वर्दळ असते.

यशोधरानगर : यशोधरानगर येथील रिंग रोडवरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरू असते. मुख्यत: कामठी रोडकडून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मुख्य रिंग रोडवर वाहतुकीची वर्दळ असते. येथील चौकात वाहतूक सिग्नल नसल्याने वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब झाली असून हा परिसर ‘अ‍ॅक्सिडेंट पॉर्इंट’ बनला आहे. यशोधरानगर रिंग रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. कामठी रोड व यादवनगरकडून यशोधरानगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. यातच कळमना मार्केट व कामठीकडे जाणाऱ्या जड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. अमरावती व काटोल रोडकडे जाणारी जड वाहनेसुद्धा याच मार्गाने जातात. वाहतूक सिग्नल नसल्याने जड वाहने भरधाव वेगाने धावतात. यातच कामठी रोड ते यशोधरानगर रोडपर्यंत ट्रक, डोझर आदी जड वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. विशेषत: यशोधरनगर पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रिंग रोडवर वाहतूक सिग्नल नसल्याने या ठिकाणाला अपघात स्थळ म्हणून ओळखले जात आहे. रिंग रोडवरून परिसरातील नागरिकांसह दररोज मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुले ये-जा करतात तेव्हा या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. मलेरियाचा मोठ्या प्रमाणात प्रकोप मनीषनगर भागात मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहेत. परंतु सुविधांच्या नावावर मात्र बोंब आहे. सर्वत्र रस्ते नाहीत. असलेल्या रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढले परिणामी मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. मनीषनगर सोबतच टोली, रामटेकेनगर, फुलवतीनगर, लोहारसमाज भवन परिसर आदी भागातही डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आजाराची शक्यता वाढली आहे. घाणीचे साम्राज्य वाढलेइतवारी रेल्वे स्टेशनसमोर दहीबाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बाजारात बाहेरगावचे शेतकरी आपला हिरवा भाजीपाला विकण्यासाठी आणतात. शहरातील मोठ्या बाजारांपैकी हा एक बाजार आहे. बाजार समितीमध्ये शौचालय आहे. परंतु त्याच्या साफसफाईकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. परिणामी सर्वत्रच दुर्गंधी असते. बाजार परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढून आजाराची शक्यता बळावली आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या बाजारातील स्वच्छतकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे. समस्यांच्या पूर्ततेसाठी महिला सरसावल्या बजाजनगर भागात बऱ्याच ठिकाणी घरासमोरील फुटपाथ मोडकळीस आले आहेत. तसेच जानेवारी महिन्यात प्रशासनाद्वारे पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याकरिता जे खोदकाम करण्यात आले, त्याचे महिना उलटूनही सिमेंटीक रण करण्यात आले नाही. त्यामुळे दुचाकी चालक, ज्येष्ठ नागरिक व बालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. तसेच परिसर अस्वच्छ व असुरक्षित राहतो. यासंबंधात गोविंद प्रधान मार्ग बजाजनगर येथील महिलांनी एकत्र येऊन झोन सभापती गोपाल बोहरे यांना समस्या निवारण्यासाठी निवेदन सादर केले. यात किरण गुप्ता, भूमिका सुटे, वैशाली पुडके, सुंदरी परवरकर आदी महिलांचा सहभाग होता.