शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

शेतकऱ्यांच्या योग्य मागण्यांची केंद्राने पूर्तता करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक जण त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक जण त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंदोलनात काही देशविघातक तत्त्वदेखील शिरले आहेत. शेतकऱ्यांना यातून काय मिळेल यावर विचार व्हायला हवा. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत त्याची केंद्राने पूर्तता करावी, अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी मांडली. २५ व २६ डिसेंबर रोजी नागपुरात ‘अभाविप’च्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अधिवेशन व्हर्च्युअल माध्यमातून करण्यात येत असून यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत बुधवारी त्या बोलत होत्या.

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृतिमंदिर रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी ३ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अधिवेशनामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे ८० पदाधिकारी प्रत्यक्ष सहभागी होणार असून, देशभरातील ४००० ठिकाणांवर स्क्रीनच्या माध्यमातून दीड लाखाहून अधिक कार्यकर्ते ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून सहभागी होतील, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये चार प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी, राष्ट्रीय स्थिती, समृद्ध भारताची ओळख आणि कोरोना व भारत या प्रस्तावांवर चर्चा होईल. अधिवेशनामध्ये सहभागी होणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्व नियमांचे पालन करूनच अधिवेशन घेतले जाणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय मंत्री हर्ष नारायण, माध्यम संयोजक राहुल चौधरी, विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते.

शिष्यवृत्तीसाठी सरकारला जाब विचारणार

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीचा वाटा ६०-४० करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्राकडून केवळ १० टक्के निधी देण्यात येत आहे. सरकार कुठल्याची राजकीय पक्ष आणि विचारधारेचे असो, जर त्यांच्याद्वारे शिष्यवृत्ती कमी केल्या जाणार असेल तर आमचा विरोध राहणार आहे. त्याबाबत सरकारला जाब विचारण्यात येईल, असे त्रिपाठी यांनी सांगितले.