शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

तांदळाच्या दादाची राजकीय दादांकडून अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या भरवशावर पाच ...

केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या भरवशावर पाच राज्यातील लाखो हेक्टर जमिनीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या या कार्याची दखल राजकीय नेत्यांना कधीच घेता आली नाही. दखल घेतली ती केवळ त्यांच्या निधनानंतर सांत्वना देण्यासाठी. त्याचवेळी या राजकीय दादांनी सच्च्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मारक उभारण्याची व त्यांना पद्मपुरस्कार देण्याची घोषणा केली. दिवस गेला, वेळ गेली आणि दादा त्यांच्या विस्मृतीसही गेले. तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांवर लाखोचा खर्च करणारे सरकार, पक्षाघात झाला तेव्हा दादांवरील उपचारासाठी कधीच सरसावले नाही. सरकारी व्यवस्थेने जगाच्या या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्र शासनाने त्यांना २००६ मध्ये कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा शासनाने पुरस्कारादाखल दिलेले सुवर्णपदक विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते सुद्धा पितळेचे निघाले. याच महिन्यात ३ जून रोजी त्यांचा तिसरा स्मृतिदिन होता. मात्र, तांदळाच्या वाणाचा आविष्कार करणाऱ्या या थोर संशोधकाबाबत शासनालाही विसर पडलेला आहे.

- डॉ. प्रकाश घवघवे, संचालक : लोकविद्यापीठ