शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

शिक्षिकेच्या प्रयत्नातून बंद होणाऱ्या शाळेला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:08 IST

() भाग (७) लोगो घ्यावा नागपूर : जिल्हा परिषदच्या ३२ शाळांचा पट हा ० ते ५ एवढा आहे. या ...

()

भाग (७) लोगो घ्यावा

नागपूर : जिल्हा परिषदच्या ३२ शाळांचा पट हा ० ते ५ एवढा आहे. या शाळांचे समायोजन झाल्यास त्या बंद होण्याची शक्यताच अधिक आहे. २०१८ मध्ये भरतवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचीही अशीच दुरवस्था होती. शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याची मानसिकताही बनविली होती; पण ऑनलाईन बदलीत सहा. शिक्षिका मनीषा उईके यांची येथे बदली झाली आणि शाळेला संजीवनी मिळाली.

सध्या त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापिकेचा प्रभार आहे. ३० मे २०१८ रोजी त्यांची भरतवाड्याच्या शाळेत बदली झाली. सहा. शिक्षिका म्हणून त्यांनी प्रभार स्वीकारल्यावर पटावर एकच विद्यार्थी बघून त्यासुद्धा गोंधळल्या होत्या. गावात कुणाशी ओळख नाही, त्यातच विनापटाची शाळा; पण हे आव्हान त्यांनी संधी म्हणून स्वीकारले. २०१८ चा अख्खा उन्हाळा शाळेत घालविला. शाळेत विद्यार्थी न येण्याची कारणे शोधली. गावातील विद्यार्थी गावाबाहेरच्या शाळेत का गेली याचा उलगडा झाल्यानंतर पालकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासंदर्भात प्रोत्साहित केले आणि २०१८-१९ सत्राच्या अखेरपर्यंत १५ विद्यार्थी दाखल झाले. त्यांची शिकविण्याची पद्धत, शाळेप्रति दाखविलेले समर्पण यामुळे गावकऱ्यांच्या विश्वास वाढला आणि २६ जून २०१९ ला त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढून २५ झाली. या सत्रात त्यांच्या शाळेचा विद्यार्थ्यांचा पट ६० वर पोहोचला आहे.

- कोरोनाच्या काळातही गावात सुरू ठेवली शाळा

२०२० च्या सत्रात कोरोना आला. शाळा बंद झाल्या. शिक्षकांना वेगवेगळी कामे देण्यात आली. या मॅडमने अख्ख्या कोरोनाकाळ गावात घालविला. घरोघरी सर्वेक्षणाचे काम करताना विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन अभ्यास घेणे सुरू ठेवले. त्यांची शाळा १ ते ५ वर्गाची. आजच्या घडीला १ ते ५ च्या सर्वच शाळा बंद आहेत; पण मॅडमची धडपड बघून गावकऱ्यांनीच स्वमर्जीने संमतीपत्र दिले. शाळेत विद्यार्थ्यांना स्वत: पाठविले. त्याही रोज २५ किलोमीटरची पायपीट करीत नियमित शाळेत जातात. गावकरी त्यांच्या पाठीशी आहेत, पालक समाधानी आहेत.

- विद्यार्थी गावाबाहेर जाऊच दिला नाही

गावातील विद्यार्थी येथेच शिकावा यासाठी स्वत: नर्सरी, केजी-१ सुरू केले. एका खासगी शिक्षिकेला नियुक्त केले. फीच्या माध्यमातून, स्वत:च्या पगारातून त्या शिक्षिकेला मानधन दिले. नर्सरीत मुले दाखल झाली. त्यांचे केजी-२ झाल्यानंतर पहिल्या वर्गात त्यांनी शाळेतच प्रवेश घेतले. आजच्या परिस्थितीत गावातील १ ते ५ चा विद्यार्थी गावाबाहेरील शाळेत जात नाही. विशेष म्हणजे आज शाळेला जिल्हा परिषदेतूनही सन्मान मिळतो आहे.

- खरं तर १ पट असलेली शाळा चालविणे आव्हान होते. ते आव्हान संधी म्हणून स्वीकारले. कामात सातत्य ठेवले. समर्पणवृत्तीने काम केले. त्यामुळे आज एकीकडे १ ते ५ च्या शाळा बंद असताना गावकऱ्यांनी मुले स्वमर्जीने शाळेत पाठविली आहेत, हेच माझ्या कामाचे फलित आहे.

मनीषा उईके, प्रभारी मुख्याध्यापिका, भरतवाडा जि.प. प्रा. शाळा