शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रेवराल रेल्वेस्थानक कात टाकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:26 IST

सर्वसामान्य, गोरगरिबांना सुखकर प्रवास घडविणाºया रेवराल रेल्वेस्थानकाचा कायापालट होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गर्दी वाढली : उड्डाण पुलासह विकास कामे प्रगतिपथावर

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : सर्वसामान्य, गोरगरिबांना सुखकर प्रवास घडविणाºया रेवराल रेल्वेस्थानकाचा कायापालट होत आहे. अवघ्या १० रुपयांमध्ये नागपूर आणि १५ रुपयात गोंदियाकडे जाणे सर्वांच्याच खिशाला परवडणारे असल्याने प्रवाशांची गर्दीदेखील वाढत आहे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे या मार्गावर रेल्वेला अतिरिक्त डबे जोडण्यात यावे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहे. दुसरीकडे उड्डाण पूल व इतर विकास कामे प्रगतिपथावर असल्याने हे रेल्वेस्थानक दिलासा देणारेच ठरत आहे.दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेच्या रेवराल स्थानकावर विकासाच्या अनेक सोईसुविधा उपलब्ध होत आहे. मौदा तालुक्यातील सुमारे ४० गावातील प्रवाशांसाठी हे रेल्वेस्थानक सोईचे ठरते. या स्थानकावरून दिवसभरात जाण्यासाठी सहा तर येण्यासाठी सहा प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. सहा गाड्या असतानाही रेवराल स्थानकावरून बसणाºया प्रवाशांना आसन मिळत नाही. यामुळे एक ते दीड तास उभे राहूनच प्रवास करावा लागतो. यात महिला व वृद्धांची मोठी गैरसोय होते. ही प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनाने सहा गाड्यांना अतिरिक्त बोगी जोडण्याची गरज आहे.या रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षी उड्डाण पुलाचे काम सुरू केले. ते आता अंतिम टप्प्यात आहे. फलाटांची उंची वाढवून पेव्हिंग टाईल्स लावल्या जात आहे. प्रेरणादायी शौचालयासह अनेक कामे प्रगतिपथावर आहेत.तालुक्यातील राजोली, खरडा, खंडाळा, पिपरी, चारभा, नांदगाव, कोदामेंढी, सावंगी, इंदोरा, बोरी (घिवारी), धानोली, वाघबोडी, अडेगाव, कथलाबोडी, वाकेश्वर, सुकळी, खिडकी, तोंडली, श्रीखंडा आदी गावे रेवराल रेल्वेस्थानकाला संलग्न असून येथील नागरिक, व्यापारी, शेतकरी, मजूर, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने या स्थानकावरून अल्पदरात रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.रोजगार निर्मितीचेकेंद्र ठरणारदिवसागणिक वाढणारी प्रवासी संख्या आणि रेल्वेस्थानकाचा झपाट्याने होणारा कायापालट पाहता रेवराल स्थानक विभिन्न रोजगार निर्मितीचे केंद्र ठरणार आहे. रेवराल स्थानकावर पोहचवून देणारी टॅक्सी, शेतमाल, फळे आदी दुसºया शहरात पाठविण्यासाठी व्यवस्था या स्थानकावरून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सहा प्रवासी गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.दररोज सहा गाड्यांचे आवागमनरेवराल स्थानकावरून टाटा-इतवारी, गोंदिया-इतवारी, तिरोडा-इतवारी, गोंदिया - इतवारी मेमू, रायपूर-इतवारी या सहा प्रवासी गाड्या इतवारी, नागपूरकडे धावतात. तसेच इतवारी-रायपूर, इतवारी- गोंदिया मेमू, इतवारी-तुमसर-तिरोडा, इतवारी-गोंदिया, इतवारी- गोंदिया मेमू आणि इतवारी-टाटा अशा गोंदियाकडे जाणाºया प्रवासी रेल्वेगाड्यांचे दररोज आवागमन होते.