शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

महसूल वसुलीत नागपूर विभाग दुसऱ्या स्थानी

By admin | Updated: April 2, 2016 03:23 IST

नागपूर विभागाने यावर्षी महसुल वसुलीमध्ये बाजी मारली आहे. नागपूर विभागाला ५३२ कोटी ८९ लाख रुपयाच्या ...

५६१.२० कोटींचे लक्ष गाठले : विभागातील सर्व जिल्ह्यात यश नागपूर : नागपूर विभागाने यावर्षी महसुल वसुलीमध्ये बाजी मारली आहे. नागपूर विभागाला ५३२ कोटी ८९ लाख रुपयाच्या महसुल वसुलीचे उद्दिष्ट असताना विभागाने तब्बल ५६१ कोटी २० लाख ६७ हजाराची वसुली करीत संपूर्ण राज्यात महसूल वसुलीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांचा यात मोठा वाटा असून सर्वांनीच यंदा १०० टक्केच्यावर वसुली केली आहे, हे विशेष. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यासंदर्भात शुक्रवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपूर विभाग हे नेहमीच महसूल वसुलीच्या बाबतीचा चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर राहत असे. परंतु यंदा नागपूर विभागाने बाजी मारली आहे. यात नागपूरसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने हे शक्य झाले आहे. तसेच तहसीलदार व इतर रिक्त पदे भरल्यामुळे सुद्धा महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले. नागपूर विभागाला २०१५-१६ या वर्षात एकूण ५३२ कोटी ८९ लाख २४ हजार रुपये इतके महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नागपूर विभागाने ३१ मार्चपर्यंत ५६१ कोटी २० लाख ६७ हजार रुपये (१०५.३१ टक्के ) इतकी वसुली केली. पहिला क्रमांकावर पुणे विभाग राहिले. त्यांनी १०९ टक्के वसुली केली. तर १०३ टक्के महसूल वसुली करीत नाशिक तिसऱ्या स्थानावर राहिले. अमरावती विभागाने १०० टक्के महसूल वसुली करून चौथे स्थान पटकावले. नागपूर विभागाचा जिल्हानिहाय विचार केला असता सर्वच जिल्ह्यांनी १०० टक्केच्या वर वसुली केली. नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक २७४ कोटी ४६ लाख रुपयांची महसूल वसुली केली. टक्केवारीनुसार विचार केला तर गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्याने विभागात सर्वाधिक १२५.६९ टक्के महसूल वसुली केली. गडचिरोली जिल्ह्याला २४ कोटी ७४ लाख २४ हजार महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याऐवजी त्यांनी ३१ कोटी ९ लाख ९३ हजार रुपये इतकी वसुली केली. याशिवाय भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांनी कधीच १०० टक्के महसूल वसुली केली नव्हती. त्यांनीसुद्धा यंदा १०० टक्केवर वसुली केली. वर्धा जिल्ह्याला ४९ कोटी ४६ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यांनी ५१ कोटी १४ लाख ७० हजाराची वसुली केली. भंडारा जिल्ह्याला ६० कोटी ५८ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने ६० कोटी ६२ लाख ७९ हजाराची वसुली केली. गोंदियाला २४ कोटी ७४ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने २८ कोटी ९९ लाख ५७ हजारांची वसुली केली. चंद्रपूरला ९८ कोटी ९१ लाखांचे उद्दिष्ट होते. त्याने ११० कोटीची वसुली केली. (प्रतिनिधी)