शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गजराज प्रकल्पाची जमीन शेतकऱ्यांना परत करा

By admin | Updated: November 16, 2015 03:13 IST

गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे..

जमिनीवर कोणतेही निर्माणकार्य नाहीनागपूर : गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी गजराज प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी केली आहे. शिवणगाव येथील १२० शेतकऱ्यांची ३६३ एकर शेतजमीन १९९३ मध्ये संरक्षण विभागाने वायूसेनेच्या गजराज प्रकल्पासाठी एक लाख पाच हजार रुपये प्रति एकर भावाने संपादन केली आहे. जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त केली असता त्यांना वायुसेनेच्या अलाहाबाद येथील मध्य वायू कमांड मुख्यालयाकडून असे सांगण्यात आले की, संपूर्ण जमीन २ सप्टेंबर १९९७ रोजी ताब्यात घेतली. गजराज प्रकल्प रद्द झालेला नसून त्याबाबत विविध टप्प्यात विकास कार्ये सुरू आहेत. प्रत्यक्षात येथील जागेवर अद्याप कोणतेही निर्माण कार्य सुरू करण्यात आले नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांजवळ जमीन नाही आणि रोजगारही नाही. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. कायद्यानुसार ही जमीन परत करण्यात यावी, अशी मागणी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)