शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव सांबरे यांचे निधन

By admin | Updated: July 8, 2016 02:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव महादेवराव सांबरे यांचे गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासुदेव महादेवराव सांबरे यांचे गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.वासुदेव सांबरे त्यांचे ज्येष्ठ पुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्याकडे राहात होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होता. त्यांचे पार्थिव औरंगाबादवरून नागपुरात आणण्यात आले. धंतोली येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. दरम्यान, न्यायमूर्ती, वकील, अधिकारी आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले न्यायमूर्ती नितीन सांबरे व अ‍ॅड. सचिन सांबरे, दोन मुली चारू व रागिणी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.२४ जून १९३२ रोजी अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबात वासुदेव सांबरे यांचा जन्म झाला. न्यायालय प्रबंधक कार्यालयात नोकरी करीत असतानाच त्यांनी १९६८ मध्ये एल.एल.बी. पदवी पूर्ण केली. यानंतर पुढील दीड दशक त्यांनी मुंबई उच्च न्यायालयासह अन्य विविध न्यायालयांत वकिली करून दिवाणी, फौजदारी, संविधानिक, कामगार, महसूल इत्यादी प्रकारची प्रकरणे हाताळली. तसेच, ते शासनाच्या विविध विभागाचे वकील होते. आॅक्टोबर-१९८१ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली. ते १९७७ पासून महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य होते. दरम्यान त्यांनी एप्रिल-१९८४ ते सप्टेंबर-१९८४ पर्यंत कौन्सिलचे अध्यक्षपद सांभाळले. याशिवाय त्यांनी नागपूर विद्यापीठासाठी व्याख्याता व परीक्षक म्हणूनही कार्य केले होते. २१ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. परिविक्षा काळ संपल्यानंतर १५ जून १९८७ रोजी त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात आले. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे कार्य केले. त्यावेळी त्यांचे अनेक निर्णय गाजले. १९९४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. वकिली करताना व न्यायमूर्ती असतानाही त्यांनी एक सभ्य व्यक्ती अशी स्वत:ची ख्याती कायम ठेवली. त्यावेळी ज्युनिअर असणाऱ्या व आता प्रस्थापित झालेल्या अनेक वकिलांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. ज्युनिअर वकिलांना ते नेहमीच प्रोत्साहन देत होते. त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रात शोककळा पसरली.(प्रतिनिधी)