शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

किरकोळमध्ये फळे महागच!

By admin | Updated: September 19, 2014 00:55 IST

सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी

सफरचंद, डाळिंबाची प्रचंड आवक : भाव आटोक्यातनागपूर : सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांमध्ये दरवाढीची शक्यता नाही, अशी माहिती विक्रेते पेंढारकर यांनी दिली. सफरचंद स्वस्तचमध्यंतरी पावसामुळे कळमन्यात सफरचंदची आवक अपेक्षेपेक्षा जास्त होती. सिमला येथून माल विक्रीस आला. २५ किलो पॅकिंगचा भाव दर्जानुसार ८०० ते १२०० रुपयांदरम्यान होता. ही स्वस्ताई ८ ते १० दिवसच राहिली. सध्या काश्मिरात वाहतूक खुली झाली आहे. लवकरच देशात सर्वत्र माल पोहोचविला जाईल. सध्या दिल्ली आणि चंदीगड येथून दररोज सफरचंदचे पाच ते सहा ट्रक कळमन्यात येत आहेत. भाव १३०० ते १७०० रुपयांदरम्यान आहेत. याशिवाय पावसाचा फटका डाळिंबाला बसल्याने मध्यंतरी आवक वाढली होती. शिवाय भावही उतरले होते. सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. ठोकमध्ये ६०० ते ७५० (१० किलो) रुपयादरम्यान भाव आहेत. मोसंबीची आवक वाढलीकळमन्यात संपूर्ण विदर्भातून मोसंबी विक्रीस येत आहे. भाव टनानुसार आहेत. किलोनुसार १५ ते २० रुपये किलो भाव आहे. दररोज १ ते ३ टन मोसंबीचे ७० ते ७५ मेटॅडोर विक्रीस येत आहेत. तुलनेत संत्र्याची आवक कमी आहे. पाऊस नसल्याने आंबिया बारला आता सुरुवात झाली आहे. काटोल, कळमेश्वर, कोंढाळी या भागातून काही शेतकरी संत्रा आणीत आहेत. विक्री टनानुसार होत असली तरीही भाव दर्जानुसार १० ते १५ रुपये किलो आहे. दररोज दोन हजार डबे (१० किलो पॅकिंग) चिकू डहाणू (पालघर) येथून कळमन्यात येत आहेत. भाव १२० ते ४०० रुपयांदरम्यान (१० किलो) आहेत. चिनी ‘फ्यूजी’ला मागणीविदेशात उत्पादित होणाऱ्या फळांची चव नागपूरकरांच्या जीभेवर रेंगाळू लागली आहे. विदेशातून आयातीत होणाऱ्या फळांच्या मागणीत वाढ होत आहे. कळमन्यात आयात फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई येथे ही फळे उतरविली जातात. तेथून ती कळमन्यात आणली जातात. आयात फळांमध्ये सफरचंदाचे प्रमाण जास्त आहे. चीनमधील ‘फ्यूजी’ सफरचंद मागणीनुसार विक्रेते मागवित आहेत. अनेक आजारांवर ही फळे उपयोगी ठरत असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. तुलनेने कमी भाव व आकर्षक पॅकेजिंग हेसुद्धा त्यातील एक मुख्य कारण आहे. फळांचा दर्जाही चांगला आहे. (प्रतिनिधी)