शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रिटेल मोबाइल विक्रेत्यांचा धंदा बसला; ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 13:15 IST

Nagpur News देशविदेशातील ई-कॉमर्स कंपन्या शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोबाइलची ऑनलाइन विक्री करीत आहेत. त्यामुळे नागपुरात कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसानदीड महिन्यांपासून दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : लॉकडाऊनमध्ये दीड महिन्यांपासून रिटेल मोबाइल विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. याउलट देशविदेशातील ई-कॉमर्स कंपन्या शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोबाइलची ऑनलाइन विक्री करीत आहेत. त्यामुळे नागपुरात कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ऑनलाइन मोबाइल विक्रीसाठी ई-कॉमर्स कंपन्यांवर प्रतिबंध लावण्याची रिटेल मोबाइल विक्रेत्यांची शासनाकडे मागणी आहे.

नागपुरात मोबाइल आणि अ‍ॅक्सेसरीज विक्रीची लहान-मोठी जवळपास ५०० दुकाने आहेत. या सर्व दुकानातून महिन्याला कोट्यवधींचा व्यवसाय होतो; पण दुकाने बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. या शिवाय वितरकाचे जाळेही खंडित झाले आहे. दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्यांवर जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंच्या विक्रीवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही या कंपन्या ग्राहकांना ऑनलाइन मोबाइलची विक्री करीत आहेत. त्याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसतो आहे. दुकाने सुरू झाल्यानंतर रिटेल मोबाइल विक्रीवर परिणाम होणार आहे. लॉकडाऊननंतरही दुकाने सुरळीत होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत सीताबर्डी येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार संघाचे पदाधिकारी सुरेंद्र दावडा यांनी सांगितले.

या संदर्भात ऑल इंडिया मोबाइल रिटेल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन याप्रकरणी त्यांचे लक्ष वेधले. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष कैलास लखनानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाइन चर्चा केली आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना राज्य शासनाने आवश्यक वस्तूंच्याच विक्रीची परवानगी दिली आहे. या कंपन्या मात्र मोबाइल, अ‍ॅक्सेसरीज आणि अन्य अनावश्यक वस्तूंचीही विक्री करीत आहेत. त्यामुळे रिटेल मोबाइल विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. सरकारने यासंदर्भात कठोर कारवाई करावी. ही बाब मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला त्वरित सूचना करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपुरात ४०० कोटींचा व्यवसाय बुडाला!

दीड महिन्यापासून रिटेल मोबाइल विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने मोबाइल आणि अ‍ॅक्सेसरीज विक्रीचा जवळपास ४०० कोटींचा व्यवसाय बुडाल्याची माहिती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, असे विक्रेते आणि वितरकांनी सांगितले. नागपुरात सर्व कंपन्यांचे वितरक असून त्यांच्या माध्यमातून विक्रेत्यांना मोबाइलचा पुरवठा करण्यात येतो. पण, लॉकडाऊनमुळे वितरण थांबले आहे. दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन विक्री करीत असल्याने विक्रेत्यांवर संकट आले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलbusinessव्यवसाय