शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

७८८ विद्यार्थ्यांचे निकाल थांबले, २३ जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST

आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील ...

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील राज्यात सर्वांत कमी ९९.८४ टक्के इतका निकाल लागला. मंडळाने कुठलीही परीक्षा आयोजित केली नव्हती, तरीदेखील ०.१६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले? यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात मंडळात दहावीसाठी १ लाख ५५ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील १ लाख ५२ हजार २६३ विद्यार्थ्यांना यशस्वी घोषित करण्यात आले. ६ हजार ६५४ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातील ५ हजार ८३३ ना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. परीक्षेत १ हजार ६३ विद्यार्थी अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. यात नियमित २४३, तर पुनर्परीक्षार्थी ८२१ इतके आहेत.

‘लोकमत’ने यासंदर्भात विविध अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अनुत्तीर्ण घोषित करण्यात आलेल्यांपैकी ७८८ विद्यार्थ्यांचे निकाल नागपूर विभागीय कार्यालयाने थांबविले आहेत, तर १२४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिलेले नाही. ७६ विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरले होते, तर इतर कारणांमुळे २२ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाळांकडून मंडळाला पाठविण्यात आलेल्या माहितीत हे कारण सांगण्यात आलेले नाही.

काही त्रुटी आढळल्या होत्या

यासंबंधात मंडळाच्या विभागीय सचिव माधुरी सावरकर यांच्याशी संपर्क केला असता, शाळांकडून देण्यात आलेल्या ७८८ विद्यार्थ्यांच्या माहितीत व मंडळाच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांचे निकाल थांबविण्यात आले. शाळांकडून माहिती मागवून त्याची पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर निकाल घोषित होतील, असे त्यांनी सांगितले.