शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

७८८ विद्यार्थ्यांचे निकाल थांबले, २३ जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST

आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील ...

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील राज्यात सर्वांत कमी ९९.८४ टक्के इतका निकाल लागला. मंडळाने कुठलीही परीक्षा आयोजित केली नव्हती, तरीदेखील ०.१६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले? यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात मंडळात दहावीसाठी १ लाख ५५ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील १ लाख ५२ हजार २६३ विद्यार्थ्यांना यशस्वी घोषित करण्यात आले. ६ हजार ६५४ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातील ५ हजार ८३३ ना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. परीक्षेत १ हजार ६३ विद्यार्थी अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. यात नियमित २४३, तर पुनर्परीक्षार्थी ८२१ इतके आहेत.

‘लोकमत’ने यासंदर्भात विविध अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अनुत्तीर्ण घोषित करण्यात आलेल्यांपैकी ७८८ विद्यार्थ्यांचे निकाल नागपूर विभागीय कार्यालयाने थांबविले आहेत, तर १२४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिलेले नाही. ७६ विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरले होते, तर इतर कारणांमुळे २२ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाळांकडून मंडळाला पाठविण्यात आलेल्या माहितीत हे कारण सांगण्यात आलेले नाही.

काही त्रुटी आढळल्या होत्या

यासंबंधात मंडळाच्या विभागीय सचिव माधुरी सावरकर यांच्याशी संपर्क केला असता, शाळांकडून देण्यात आलेल्या ७८८ विद्यार्थ्यांच्या माहितीत व मंडळाच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांचे निकाल थांबविण्यात आले. शाळांकडून माहिती मागवून त्याची पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर निकाल घोषित होतील, असे त्यांनी सांगितले.